शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

अमरनाथ हल्ल्यावरून विरोधकांचे पंतप्रधानांवर टीकास्र

By admin | Updated: July 11, 2017 17:21 IST

हेरखात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतरही अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला रोखण्यात अपयश आल्याने विरोधी पक्षांनी पंतप्रधान

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - हेरखात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतरही अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला रोखण्यात अपयश आल्याने विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडले आहे. आज उपराष्ट्रपतीपदासाठी आपल्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी 18 विरोधी पक्षांची बैठक संसदेच्या लायब्ररीत झाली. यावेळी गुप्त सुचना असतानाही अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला भ्याड हल्ला रोखता न आल्याने सरकारने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा टोला विरोधी पक्षांनी लगावला.
 अमरनाथ यात्रेकरूंवर अनंतनाग येथे झालेला हल्ला हा माणुसकी आणि देशाच्या विविधतेवरील हल्ला असल्याचे विरोधी पक्षांनी सांगितले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा हल्ला म्हणजे सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर आणि अस्वीकाहार्य त्रुटी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच या हल्ल्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारावी असा टोलाही त्यांनी लगावला. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. "सुरक्षेतील ही त्रुटी गंभीर आणि अस्वीकाहार्य आहे. याची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ देता कामा नये." 
 गुप्त सूचना असतानाही हा हल्ला रोखता आला नाही, यासाठी सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्ष म्हणले. तसेच त्यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला.  दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. अधिक वाचा
( अमरनाथ यात्रा हल्ला; बसचालक सलीमला 3 लाखांचं बक्षीस जाहीर )(अमरनाथ हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश)
 
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.