शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अमरनाथ हल्ल्यावरून विरोधकांचे पंतप्रधानांवर टीकास्र

By admin | Updated: July 11, 2017 17:21 IST

हेरखात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतरही अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला रोखण्यात अपयश आल्याने विरोधी पक्षांनी पंतप्रधान

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - हेरखात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतरही अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला रोखण्यात अपयश आल्याने विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडले आहे. आज उपराष्ट्रपतीपदासाठी आपल्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी 18 विरोधी पक्षांची बैठक संसदेच्या लायब्ररीत झाली. यावेळी गुप्त सुचना असतानाही अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला भ्याड हल्ला रोखता न आल्याने सरकारने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा टोला विरोधी पक्षांनी लगावला.
 अमरनाथ यात्रेकरूंवर अनंतनाग येथे झालेला हल्ला हा माणुसकी आणि देशाच्या विविधतेवरील हल्ला असल्याचे विरोधी पक्षांनी सांगितले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा हल्ला म्हणजे सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर आणि अस्वीकाहार्य त्रुटी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच या हल्ल्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारावी असा टोलाही त्यांनी लगावला. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. "सुरक्षेतील ही त्रुटी गंभीर आणि अस्वीकाहार्य आहे. याची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ देता कामा नये." 
 गुप्त सूचना असतानाही हा हल्ला रोखता आला नाही, यासाठी सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्ष म्हणले. तसेच त्यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला.  दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. अधिक वाचा
( अमरनाथ यात्रा हल्ला; बसचालक सलीमला 3 लाखांचं बक्षीस जाहीर )(अमरनाथ हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश)
 
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.