शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मोदी तिरस्कार, भय आणि क्रोधाची भावना निर्माण करत आहेत, राहुल गांधींची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 13:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणाला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणाला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला हेतू साध्य करण्यासाठी ठरावीक वर्गामध्ये तिरस्कार, भय आणि क्रोधाचे वातावरण निर्माण करत आहेत. पण आम्ही सर्व भारतीयांच्या मनात प्रेम आणि करुणा निर्माण करत आहोत. देशबांधणीसाठी हाच एक मार्ग आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

शुक्रवारी लोकसभेत सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आरोप प्रत्यारोपांची जुलगबंदी रंगली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी राफेल करारासह विविध विषयांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदींच्या लोकसभेतील भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. "संसदेमध्ये काल झालेल्या चर्चेचे सार काढल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला हेतू साध्य करण्यासाठी  देशातील नागरिकांच्या हृदयामध्ये तिरस्कार, भय आणि क्रोधाची भावना निर्माण करत आहेत, असे वाटते. मात्र आम्ही सर्व भारतीयांच्या मनात प्रेम आणि करुणा निर्माण करत आहोत. देशबांधणीसाठी हाच एक मार्ग आहे, असे राहुल गांधी म्हणाले.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी