शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, भटिंडाच्या एसएसपींसह 5 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 08:55 IST

PM security breach: बुधवारी, काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जवळपास 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून राहिला होता, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला पंजाब दौरा अर्धवट सोडून परतले.

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान 'सुरक्षेत मोठी चूक' केल्याबद्दल भटिंडा पोलीस प्रमुखांसह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शुक्रवारी येथील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भटिंडाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) अजय मलुजा आणि इतर पाच अधिकारी पंतप्रधानांच्या 5 जानेवारीला राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार होते. यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, गृह मंत्रालय हे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकार्‍यांचे संवर्ग नियंत्रण प्राधिकरण आहे.

बुधवारी, काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जवळपास 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून राहिला होता, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला पंजाब दौरा अर्धवट सोडून परतले. गृह मंत्रालयाने या घटनेला सुरक्षेतील मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "होय, आम्ही भटिंडा एसएसपीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान सुरक्षेतील गंभीर त्रुटींबद्दल त्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे." अजय मलुजा हे सध्या भटिंडाचे एसएसपी आहेत.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यात कर्तव्यावर असलेल्या पंजाब पोलिसांच्या किमान पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. इतर अधिकार्‍यांची ओळख तात्काळ उघड झाली नाही, परंतु सूत्रांनी सांगितले की ते एसएसपी, डीआयजी आणि त्याहून अधिक दर्जाचे पोलिस अधिकारी आहेत. गृह मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीसद्वारे, अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील), नियम, 1969 मध्ये विहित केलेल्या शिस्तभंगाच्या कार्यवाहीसह कायद्यानुसार कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सचिव (सुरक्षा), कॅबिनेट सचिवालय सुधीर कुमार सक्सेना यांच्या नेतृत्त्वाखाली इंटेलिजन्स ब्युरोचे संयुक्त संचालक बलबीर सिंग आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) आयजी एस सुरेश यांची समिती स्थापन केली आहे. केंद्राने समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब