शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, भटिंडाच्या एसएसपींसह 5 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 08:55 IST

PM security breach: बुधवारी, काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जवळपास 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून राहिला होता, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला पंजाब दौरा अर्धवट सोडून परतले.

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान 'सुरक्षेत मोठी चूक' केल्याबद्दल भटिंडा पोलीस प्रमुखांसह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शुक्रवारी येथील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भटिंडाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) अजय मलुजा आणि इतर पाच अधिकारी पंतप्रधानांच्या 5 जानेवारीला राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार होते. यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, गृह मंत्रालय हे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकार्‍यांचे संवर्ग नियंत्रण प्राधिकरण आहे.

बुधवारी, काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जवळपास 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून राहिला होता, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला पंजाब दौरा अर्धवट सोडून परतले. गृह मंत्रालयाने या घटनेला सुरक्षेतील मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "होय, आम्ही भटिंडा एसएसपीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान सुरक्षेतील गंभीर त्रुटींबद्दल त्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे." अजय मलुजा हे सध्या भटिंडाचे एसएसपी आहेत.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यात कर्तव्यावर असलेल्या पंजाब पोलिसांच्या किमान पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. इतर अधिकार्‍यांची ओळख तात्काळ उघड झाली नाही, परंतु सूत्रांनी सांगितले की ते एसएसपी, डीआयजी आणि त्याहून अधिक दर्जाचे पोलिस अधिकारी आहेत. गृह मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीसद्वारे, अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील), नियम, 1969 मध्ये विहित केलेल्या शिस्तभंगाच्या कार्यवाहीसह कायद्यानुसार कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सचिव (सुरक्षा), कॅबिनेट सचिवालय सुधीर कुमार सक्सेना यांच्या नेतृत्त्वाखाली इंटेलिजन्स ब्युरोचे संयुक्त संचालक बलबीर सिंग आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) आयजी एस सुरेश यांची समिती स्थापन केली आहे. केंद्राने समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब