ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७ - भारताचे मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. दरम्यान, नवीन सरकार स्थापन होईपर्यंत प्रभारीपद कायम ठेवावे, असे राष्ट्रपतींनी यावेळी पंतप्रधानांना सांगितले.
शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालानंतर भाजपाला घवघवीत यश मिळाले तर युपीए सरकारच्या सलग १० वर्षांच्या सत्तेची अखेर झाली. शनिवारी सकाळी मनमोहन सिंग यांनी राष्ट्राल उद्देशून अखेरचे भाषण केले व नव्या सरकारला शुभेच्छा देत भारताची प्रगतीपथावरील वाटचाल कायम राहो अशी आशा व्यक्त केली. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारा पंतप्रधनांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन राजीनामा सुपूर्त केला.