शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

PM नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर करणार ध्वजारोहण; भाषणात कोणते मुद्दे असतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 06:01 IST

असा बहुमान मिळविणारे ठरणार पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकावतील. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे लाल किल्ल्यावरील त्यांचे अखेरचे भाषण असेल. विशेष म्हणजे, याआधी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग या तीनच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर किमान दहा वेळा तिरंगा फडकविला आहे. हा मान मिळविणारे माेदी हे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान असतील.   

स्वातंत्र्यदिनाचे भाषण हे राजकीय भाषण नसते. तरी पाच राज्यांच्या विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीची झलक पंतप्रधानांच्या भाषणात असू शकते.

मणिपूरच्या घटनांचाही उल्लेख शक्य 

सुत्रांनी सांगितले की, ज्या प्रकारे पंतप्रधानांनी संसदेत मणिपूरवर भाष्य केले होते तसाच उल्लेख पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात करू शकतात. त्यांच्या भाषणात देशाच्या वाढत्या आर्थिक स्थितीवरही भर दिला जाऊ शकतो. जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनणे, ही मोठी कामगिरी असल्याचे सांगितले जाईल.

शेतकऱ्यांवरही बोलणार 

गत तीन दिवसांपासून पीएमओ हे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि त्यांच्या मंत्रालयाच्या सचिवांच्या संपर्कात आहेत. सुत्रांनी सांगितले की, आपल्या भाषणात पंतप्रधान शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करू शकतात. त्यांच्या भाषणात प्रधानमंत्री सन्मान निधी, पीक विमा योजना, युरियाची उपलब्धता, जागतिक अन्न संकटाचा भारतावर परिणाम नाही, अशा विषयांचा उल्लेख असू शकतो.

ठाण्याचे शेतकरी दाम्पत्य ‘विशेष अतिथी’!

केंद्र सरकारने बंधनकारक केलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’(पीएमके) योजनेसाठी उत्कृष्ट कामकाज केल्याने राज्यात ठाणे व पुणे जिल्हा अव्वल ठरला आहे. या जिल्ह्यातील दोन शेतकरी लाभार्थी दाम्पत्यांना दिल्ली येथील १५ ऑगस्टच्या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून केंद्र सरकारने आमंत्रित केले आहे. हा विशेष अतिथींचा सन्मान ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यामधील विजय गोटीराम ठाकरे आणि त्यांच्या पत्नी संगीता ठाकरे या दाम्पत्यास मिळाला आहे.

महिलांना लाभ देणाऱ्या १० मोठ्या योजनांचा उल्लेख भाषणात असू शकते. देशातील ही अर्धी लोकसंख्या मोदी यांची समर्थक असल्याचे मानले जाते. तीन तलाक रद्द केल्यानंतर मुस्लीम महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे.

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदी