शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

PM नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर करणार ध्वजारोहण; भाषणात कोणते मुद्दे असतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 06:01 IST

असा बहुमान मिळविणारे ठरणार पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकावतील. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे लाल किल्ल्यावरील त्यांचे अखेरचे भाषण असेल. विशेष म्हणजे, याआधी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग या तीनच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर किमान दहा वेळा तिरंगा फडकविला आहे. हा मान मिळविणारे माेदी हे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान असतील.   

स्वातंत्र्यदिनाचे भाषण हे राजकीय भाषण नसते. तरी पाच राज्यांच्या विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीची झलक पंतप्रधानांच्या भाषणात असू शकते.

मणिपूरच्या घटनांचाही उल्लेख शक्य 

सुत्रांनी सांगितले की, ज्या प्रकारे पंतप्रधानांनी संसदेत मणिपूरवर भाष्य केले होते तसाच उल्लेख पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात करू शकतात. त्यांच्या भाषणात देशाच्या वाढत्या आर्थिक स्थितीवरही भर दिला जाऊ शकतो. जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनणे, ही मोठी कामगिरी असल्याचे सांगितले जाईल.

शेतकऱ्यांवरही बोलणार 

गत तीन दिवसांपासून पीएमओ हे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि त्यांच्या मंत्रालयाच्या सचिवांच्या संपर्कात आहेत. सुत्रांनी सांगितले की, आपल्या भाषणात पंतप्रधान शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करू शकतात. त्यांच्या भाषणात प्रधानमंत्री सन्मान निधी, पीक विमा योजना, युरियाची उपलब्धता, जागतिक अन्न संकटाचा भारतावर परिणाम नाही, अशा विषयांचा उल्लेख असू शकतो.

ठाण्याचे शेतकरी दाम्पत्य ‘विशेष अतिथी’!

केंद्र सरकारने बंधनकारक केलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’(पीएमके) योजनेसाठी उत्कृष्ट कामकाज केल्याने राज्यात ठाणे व पुणे जिल्हा अव्वल ठरला आहे. या जिल्ह्यातील दोन शेतकरी लाभार्थी दाम्पत्यांना दिल्ली येथील १५ ऑगस्टच्या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून केंद्र सरकारने आमंत्रित केले आहे. हा विशेष अतिथींचा सन्मान ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यामधील विजय गोटीराम ठाकरे आणि त्यांच्या पत्नी संगीता ठाकरे या दाम्पत्यास मिळाला आहे.

महिलांना लाभ देणाऱ्या १० मोठ्या योजनांचा उल्लेख भाषणात असू शकते. देशातील ही अर्धी लोकसंख्या मोदी यांची समर्थक असल्याचे मानले जाते. तीन तलाक रद्द केल्यानंतर मुस्लीम महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे.

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदी