शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Triple Talaq Bill : आज करोडो मुस्लिम माता-भगिनींचा विजय झाला  - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 20:49 IST

'संपूर्ण देशासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे.'

नवी दिल्ली : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही ऐतिहासिक अशा तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला आज मंजुरी मिळाली. या विधेयकावर घेण्यात आलेल्या मतमोजणीदरम्यान विधेयकाच्या बाजूने 99 आणि विरोधात 84 मते पडली. आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. 

राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या विधेयकाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, "संपूर्ण देशासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. आज करोडो मुस्लिम माता-भगिनींचा विजय झाला असून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या तिहेरी तलाकच्या कुप्रथेपासून आज पीडित मुस्लीम महिलांना न्याय मिळाला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त मी सर्व खासदारांचे आभार व्यक्त करतो."

याचबरोबर, नरेंद्र मोदी म्हणाले, "तिहेरी तलाक बिल मंजूर होणे म्हणजे महिला सशक्तिकरणच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. तुष्टीकरणाच्या नावाखाली देशातील करोडो माता-भगिनींना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेण्याचे पाप केले. मला गर्व आहे की, मुस्लिम महिलांना त्यांचा अधिकार देण्याचा गौरव आमच्या सरकारला मिळाला आहे."

दरम्यान, मोदी सरकार परत सत्तेवर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा तिहेरी तलाक विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान, लोकसभेमध्ये भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने हे विधेयक लोकसभेत पुन्हा एकदा पारीत झाले होते. मात्र राज्यसभेत भाजपा आणि मित्रपक्षांकडे बहुमत नसल्याने या विधेयकाचे काय होणार याकडे सर्वांकडे लक्ष लागले होते. अखेर मित्रपक्षांचा सभात्याग आणि विरोधी पक्षांच्या विरोधानंतरही आवश्यक संख्याबळाची पूर्तता करण्यात यश आल्याने तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीtriple talaqतिहेरी तलाकRajya Sabhaराज्यसभा