शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

संकटकाळातही देश विकासाच्या मार्गावर, जागतिक संघटनांचा आता भारतावर विश्वास वाढला: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 14:24 IST

राजकीय स्थैर्य आणि गेल्या आठ वर्षांत सातत्यानं केलेल्या सुधारणांमुळे भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण बनलं आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केलं.

नवी दिल्ली-

राजकीय स्थैर्य आणि गेल्या आठ वर्षांत सातत्यानं केलेल्या सुधारणांमुळे भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण बनलं आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केलं. जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या संस्था तसंच विश्वसनीय दुवा म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे, असंही ते म्हणाले. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (ओईसीडी) भारताबाबत बोलताना सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं म्हटलं आहे. 

आज इंदूरमध्ये मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या 'इन्व्हेस्ट मध्य प्रदेश' च्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. "२०१४ पासून देशात सुधारणा, परिवर्तन आणि उत्तम कामगिरी करण्यात आली आहे. कोविड-19 च्या संकटातही आम्ही सुधारणांचा मार्ग सोडला नाही. आत्मनिर्भर भारत मोहिमेने देशातील सुधारणांना मोठी गती दिली आहे. परिणामी, आज भारत हे गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

जागतिक संस्थांचा भारतावर अतूट विश्वास : पंतप्रधान मोदीमजबूत लोकशाही, राजकीय स्थैर्य आणि तरुण मानवी संसाधनामुळे गुंतवणूकदारांचा भारताप्रती आशावाद दिसून येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. "जागतिक अर्थव्यवस्थेवर बारकाईनं लक्ष ठेवणाऱ्या संस्थांनी भारतावर विश्वास दाखवला आहे आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनीही देशाबद्दल असाच आशावाद कायम राखला आहे", असं मोदी म्हणाले. 

आंतरराष्ट्रीय संस्था भारताबद्दल आशावादी आहेत हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) भारताच्या मजबूत आर्थिक मूलभूत गोष्टींमुळे देशाला जागतिक अर्थव्यवस्थेत "उज्ज्वल स्थान" म्हणून पाहतो. तसंच जागतिक बँकेनंही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अधिक चांगल्या स्थितीत असल्याचं म्हटलं आहे. 

भारत रोज नवनवे विक्रम रचत आहे: पंतप्रधान मोदीभारत जागतिक समूहातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं मत ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) ने व्यक्त केलं आहे. भारताकडे सध्या G20 चे अध्यक्षपद देखील आहे. एका नामांकित बँकेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, बहुतांश गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी भारताला पसंती दिली आहे. भारतात थेट परकीय गुंतवणूक (FDI) दररोज नवनवीन विक्रम निर्माण करत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी