शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शीख गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:42 IST

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील.

नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 21 एप्रिल रोजी शीख गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त लाल किल्ल्यावरून  (Red Fort) देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी माहिती दिली. 

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील. मंत्रालयाने सांगितले की, यावेळी 400 रागी (शीख संगीतकार) 'शबद कीर्तन' गातील. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशातील आणि जगातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववे शीख गुरु तेग बहादूर यांच्या प्रकाश पर्वानिमित्त दिल्लीतील शिशगंज गुरुद्वाराला भेट दिली होती.

नरेंद्र मोदींनी ट्विट करून म्हटले होते की, "आज मी गुरुद्वारा शीशगंज साहिबमध्ये प्रार्थना केली. श्री गुरू तेग बहादूर जी यांचे जीवन, आदर्श आणि सर्वोच्च बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही." तसेच, नरेंद्र मोदींनी त्यांचे काही फोटोही ट्विट केले होते. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींनी गुरुद्वाराला भेट दिली होती, तेव्हा सर्वसामान्यांच्या सोयीच्या दृष्टीने रस्त्यांवर कोणताही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता आणि कोणतेही बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते.

दरम्यान, विशेष म्हणजे केंद्र सरकारने गुरु तेग बहादूर यांचे 400 वे प्रकाश पर्व थाटामाटात साजरे करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठकही नुकतीच झाली. या बैठकीत नरेंद्र म्हणाले होते की, गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व साजरा करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी