शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

जागतिक अशांततेच्या काळात सामर्थ्यवान भारत आज जगासाठी नवी आशा: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 06:22 IST

सॉफ्टवेअर ते स्पेसपर्यंत एका नव्या भविष्यासाठी तत्पर देश म्हणून आम्ही पुढे येत आहोत. देशाच्या या यशाचे श्रेय देशातील युवकांना असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

बडोदा : कोरोनासाथ आणि जागतिक अशांततेच्या, संघर्षाच्या काळात भारत एक सामर्थ्यवान देश म्हणून पुढे आला आहे. असे सांगतानाच जगासाठी भारत आज एक नवी आशा आहे आणि अनेक समस्यांवरील उत्तरेही काढली जात आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. 

गुजरातच्या बडोदा शहरात कुंडलधामस्थित स्वामिनारायण मंदिर आणि करेलीबागच्या स्वामिनारायण मंदिराकडून आयोजित युवा शिबिरात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही अशा एका नव्या भारताची जडणघडण करत आहोत, ज्याची ओळख नवी असेल. जो देश भविष्याकडे पाहत असेल, पण त्याची परंपरा प्राचीन असेल. 

मोदी म्हणाले की, कोरोनासाथीच्या संकटाच्या काळात देशाने लसी आणि औषधांचा पुरवठा केला. जागतिक अशांतता आणि संघर्षाच्या काळात एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून भारत पुढे आला आहे. त्यामुळेच देश आज जगासाठी एक नवी आशा बनला आहे. हवामान बदलाच्या धोक्याबाबत ते म्हणाले की, आज भारतच असा देश आहे, जो अशा अनेक प्रश्नांवर उत्तरे शोधत आहे, नेतृत्व करत आहे.

सॉफ्टवेअर ते स्पेसपर्यंत नव्या भविष्यासाठी तयार 

- मोदी म्हणाले की, सॉफ्टवेअर ते स्पेसपर्यंत एका नव्या भविष्यासाठी तत्पर देश म्हणून आम्ही पुढे येत आहोत. देशाच्या या यशाचे श्रेय देशातील युवकांना असल्याचे ते म्हणाले. 

- स्टार्टअपचा उल्लेख करून ते म्हणाले की, या क्षेत्रात भारत आज जगातील तिसरा सर्वात मोठा इकोसिस्टी आहे. त्यांनी युवकांना आवाहन केले की, १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत त्यांनी डिजिटल देवाणघेवाण करावी आणि नगदी व्यवहार करू नये. असे केल्यास देशात एक नवी क्रांती येऊ शकते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीvadodara-pcवडोदरा