शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

मनमोहन सिंगांच्या १४ वर्षांपूर्वीच्या 'त्या' विधानावर पंतप्रधान मोदींचा निशाणा; म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: December 22, 2020 13:49 IST

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद

अलिगढ: राजकारण केवळ समाजाचा एक भाग आहे. पण राजकारण-सत्तेपेक्षा समाज वेगळा असतो. सत्तपेक्षा समाज मोठा आहे आणि त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. ते अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात बोलत होते. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या १४ वर्षांपूर्वीच्या विधानाला अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं.समाजात वैचारिक मतभेद असतात. मात्र जेव्हा देशाचा विषय असतो, त्यावेळी सगळ्यांनी मतभेद बाजूला सारायला हवेत. व्यक्ती कोणत्याही जाती-धर्माची असो, तिनं देशाला आत्मनिर्भर करण्यात योगदान द्यायला हवं. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून बाहेर पडलेल्या अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाचं योगदान दिलं. वैचारिक बैठक वेगळी असूनही ते देशासाठी लढले, असं मोदींनी म्हटलं.आपण एक लक्ष्य समोर ठेवून मार्गक्रमण सुरू केल्यावर काही जणांना त्रास होईल. अशा प्रवृत्ती प्रत्येक समाजात असतात. मात्र आपण त्यांच्या पुढे जायला हवं. गेल्या शतकात मतभेदांमुळे बराच वेळ वाया गेला. मात्र आता वेळ वाया न घालवता आत्मनिर्भर भारताचं लक्ष्य गाठण्यासाठी आपण पावलं टाकायला हवीत, असं मोदी म्हणाले.अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण होत असल्यानं विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांबद्दल संशोधन करावं, असं आवाहन मोदींनी केलं. 'लोकांना फारसे परिचित नसलेले, विस्मृतीत गेलेले अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत. विद्यार्थ्यांनी ७५ आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची आणि २५ महिला स्वातंत्र्य सैनिकांची माहिती गोळा करावी,' असं मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं.जे देशाचं आहे, ते देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे, असं मोदी म्हणाले. मोदींनी या विधानातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे. देशातल्या संसाधनांवर सर्वप्रथम अल्पसंख्यांकांचा अधिकार असल्याचं मनमोहन सिंग यांनी १४ वर्षांपूर्वी म्हटलं होतं. स्वच्छ भारत मिशनमुळे शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींचं प्रमाण ७० टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आल्याचं ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग