शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

मनमोहन सिंगांच्या १४ वर्षांपूर्वीच्या 'त्या' विधानावर पंतप्रधान मोदींचा निशाणा; म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: December 22, 2020 13:49 IST

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद

अलिगढ: राजकारण केवळ समाजाचा एक भाग आहे. पण राजकारण-सत्तेपेक्षा समाज वेगळा असतो. सत्तपेक्षा समाज मोठा आहे आणि त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. ते अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात बोलत होते. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या १४ वर्षांपूर्वीच्या विधानाला अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं.समाजात वैचारिक मतभेद असतात. मात्र जेव्हा देशाचा विषय असतो, त्यावेळी सगळ्यांनी मतभेद बाजूला सारायला हवेत. व्यक्ती कोणत्याही जाती-धर्माची असो, तिनं देशाला आत्मनिर्भर करण्यात योगदान द्यायला हवं. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून बाहेर पडलेल्या अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाचं योगदान दिलं. वैचारिक बैठक वेगळी असूनही ते देशासाठी लढले, असं मोदींनी म्हटलं.आपण एक लक्ष्य समोर ठेवून मार्गक्रमण सुरू केल्यावर काही जणांना त्रास होईल. अशा प्रवृत्ती प्रत्येक समाजात असतात. मात्र आपण त्यांच्या पुढे जायला हवं. गेल्या शतकात मतभेदांमुळे बराच वेळ वाया गेला. मात्र आता वेळ वाया न घालवता आत्मनिर्भर भारताचं लक्ष्य गाठण्यासाठी आपण पावलं टाकायला हवीत, असं मोदी म्हणाले.अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण होत असल्यानं विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांबद्दल संशोधन करावं, असं आवाहन मोदींनी केलं. 'लोकांना फारसे परिचित नसलेले, विस्मृतीत गेलेले अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत. विद्यार्थ्यांनी ७५ आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची आणि २५ महिला स्वातंत्र्य सैनिकांची माहिती गोळा करावी,' असं मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं.जे देशाचं आहे, ते देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे, असं मोदी म्हणाले. मोदींनी या विधानातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे. देशातल्या संसाधनांवर सर्वप्रथम अल्पसंख्यांकांचा अधिकार असल्याचं मनमोहन सिंग यांनी १४ वर्षांपूर्वी म्हटलं होतं. स्वच्छ भारत मिशनमुळे शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींचं प्रमाण ७० टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आल्याचं ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग