शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

“सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने, संकल्पाने २०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 07:54 IST

PM Modi addresses the nation on 78th Independence Day: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले.

PM Modi addresses the Nation on 78th Independence Day: संपूर्ण देश ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विकसित भारत करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनाच्या सांगितले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या अगणित स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या चिंतेत भर पडली आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपले कुटुंबीय गमावले; राष्ट्राचेही नुकसान झाले आहे. त्या सर्वांप्रती सहानुभूती व्यक्त करतो आणि खात्री देतो की, या संकटाच्या वेळी हे राष्ट्र त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

२०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो

आताच्या घडीला देशात १४० कोटी जनता आहे. जर आपण संकल्प केला आणि एकत्रितपणे वाटचाल केली तर, सर्व अडथळे पार करत २०४७ पर्यंत नक्कीच विकसित भारत बनवू शकतो, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी संबोधनाच्या सुरुवातीला केला. एक काळ असा होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान द्यायला तयार होते. परंतु, आजचा काळ देशासाठी जगण्याचा आहे. देशासाठी बलिदान देण्याची तयारी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते, तर देशासाठी जगण्याचा संकल्प भारताला समृद्ध करू शकतो. नेशन फर्स्टच्या संकल्पाने आम्ही प्रेरित आहोत. 'व्होकल फॉर लोकल'चा मंत्र आम्ही दिला. मला आनंद होत आहे की, व्होकल फॉर लोकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

दरम्यान, आमच्या सुधारणांची बांधिलकी चार दिवसांच्या टाळ्यांसाठी नाही, आमच्या सुधारणांची प्रक्रिया कोणत्याही जबरदस्तीमुळे घडून आलेली नाही, तर ती देशाला मजबूत करण्याची आहे. आम्ही राजकीय दबावामुळे कोणताही निर्णय घेत नाही, आम्ही राजकीय गणितांनुसार निर्णय घेत नाही. आमचा एकच संकल्प आहे की, प्रथम राष्ट्रहित, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्ला