शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:17 IST

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा १ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. युनेस्कोच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

PM Modi UNESCO 12 Forts: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यासह ११, तर तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा यात समावेश आहे. १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. 'प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे', अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

स्वराज्याच्या पाऊल खुणा असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या कार्याची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील ११, तर देशातील १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. या निर्णयावर शिवप्रेमी आनंद व्यक्त करत आहेत. पंतप्रधान मोदींनाही आपल्या भावना व्यक्त करणे अनावर झाले. 

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

मराठा मिलिटरी लँडस्केप्समधील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "प्रत्येक भारतीय ह्या सन्मानाने आनंदित झाला आहे. या मराठा मिलिटरी लँडस्केप्समध्ये १२ भव्य किल्ल्यांचा समावेश आहे. यापैकी ११ महाराष्ट्रात आहेत, १ तामिळनाडूमध्ये आहे."

वाचा >>१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."

'शिवाजी महाराज आपल्याला प्रेरणा देतात'

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडतो. कोणत्याही अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीने हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात", अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. 

मोदींनी जनतेला केले आवाहन

"मी सर्वांना आवाहन करतो की, या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या", असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्ताने जनतेला केले आहे. 

जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आलेले ते १२ किल्ले कोणते?

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये ज्या किल्ल्यांचा समावेश केला आहे, त्यामध्ये किल्ले शिवनेरी, स्वराज्याची राजधानी राजगड व रायगड यांच्यासह साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील, तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ला आहे.

टॅग्स :FortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNarendra Modiनरेंद्र मोदीhistoryइतिहास