शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

“संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त, पण व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 14:29 IST

PM Narendra Modi News: अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत भारत इथपर्यंत पोहोचला आहे. दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे, ते जगालाही पटू लागले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi News: आताची वेळ सर्वांच्या विकासाची आणि कल्याणाची आहे. जागतिक विकासाच्या आड येत असलेल्या संकटावर मात करून मानवकेंद्रित विचारसरणीने आपल्याला पुढे जायचे आहे. जगाकडे एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक आत्मा या दृष्टीकोनातून पाहावे. भारताला अनेक दशकांपासून सीमेपलीकडील दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. दहशतवाद्यांनी हजारो निष्पाप लोकांची हत्या केली आहे. आमच्या संसदेलाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. दहशतवादी खासदारांना ओलीस घेऊन त्यांचा खात्मा करण्याच्या तयारीत होते. अशा अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत भारत इथपर्यंत पोहोचला आहे. संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त आहे. मात्र, दहशतवादाच्या परिभाषेबाबत एकमत होत नाही हे दुःखद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्लीत आयोजित जी-२० संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. हे संमेलन एक प्रकारे जगभरातील संसदीय प्रक्रियांचे महाकुंभ आहे. शांतता, बंधुभाव जोपासण्याचा काळ असून, सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

दहशतवाद हे मोठे आव्हान, याची जगालाही जाणीव

दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे, हे आता जगालाही पटू लागले आहे. जगभरात कुठेही दहशतवाद घडो, त्याचे कारण, स्वरुप काहीही असो, तो मानवतेच्या विरोधातच असतो. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी दहशतवादाबाबत सातत्याने कठोर राहावे. दहशतवादाच्या व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक आहे. दहशतवादासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनांमध्ये एकमत व्हायला हवे. दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात आपण एकत्र कसे काम करू शकतो, याचा विचार जगभरातील संसद आणि प्रतिनिधींना करावा लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

दरम्यान, भारताची संसदीय प्रक्रिया काळानुरूप सुधारली आहे. दहशतवादाविरुद्ध भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही सुद्धा भारतात आहे. हे चर्चेसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. तसेच, भारतातील सार्वत्रिक निवडणुका एखाद्या सणासारख्या असतात. स्वातंत्र्यानंतर भारतात १७ सार्वत्रिक निवडणुका आणि ३०० हून अधिक विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNew Delhiनवी दिल्ली