शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

“संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त, पण व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 14:29 IST

PM Narendra Modi News: अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत भारत इथपर्यंत पोहोचला आहे. दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे, ते जगालाही पटू लागले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi News: आताची वेळ सर्वांच्या विकासाची आणि कल्याणाची आहे. जागतिक विकासाच्या आड येत असलेल्या संकटावर मात करून मानवकेंद्रित विचारसरणीने आपल्याला पुढे जायचे आहे. जगाकडे एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक आत्मा या दृष्टीकोनातून पाहावे. भारताला अनेक दशकांपासून सीमेपलीकडील दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. दहशतवाद्यांनी हजारो निष्पाप लोकांची हत्या केली आहे. आमच्या संसदेलाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. दहशतवादी खासदारांना ओलीस घेऊन त्यांचा खात्मा करण्याच्या तयारीत होते. अशा अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत भारत इथपर्यंत पोहोचला आहे. संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त आहे. मात्र, दहशतवादाच्या परिभाषेबाबत एकमत होत नाही हे दुःखद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्लीत आयोजित जी-२० संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. हे संमेलन एक प्रकारे जगभरातील संसदीय प्रक्रियांचे महाकुंभ आहे. शांतता, बंधुभाव जोपासण्याचा काळ असून, सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

दहशतवाद हे मोठे आव्हान, याची जगालाही जाणीव

दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे, हे आता जगालाही पटू लागले आहे. जगभरात कुठेही दहशतवाद घडो, त्याचे कारण, स्वरुप काहीही असो, तो मानवतेच्या विरोधातच असतो. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी दहशतवादाबाबत सातत्याने कठोर राहावे. दहशतवादाच्या व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक आहे. दहशतवादासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनांमध्ये एकमत व्हायला हवे. दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात आपण एकत्र कसे काम करू शकतो, याचा विचार जगभरातील संसद आणि प्रतिनिधींना करावा लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

दरम्यान, भारताची संसदीय प्रक्रिया काळानुरूप सुधारली आहे. दहशतवादाविरुद्ध भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही सुद्धा भारतात आहे. हे चर्चेसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. तसेच, भारतातील सार्वत्रिक निवडणुका एखाद्या सणासारख्या असतात. स्वातंत्र्यानंतर भारतात १७ सार्वत्रिक निवडणुका आणि ३०० हून अधिक विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNew Delhiनवी दिल्ली