शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

“संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त, पण व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 14:29 IST

PM Narendra Modi News: अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत भारत इथपर्यंत पोहोचला आहे. दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे, ते जगालाही पटू लागले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi News: आताची वेळ सर्वांच्या विकासाची आणि कल्याणाची आहे. जागतिक विकासाच्या आड येत असलेल्या संकटावर मात करून मानवकेंद्रित विचारसरणीने आपल्याला पुढे जायचे आहे. जगाकडे एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक आत्मा या दृष्टीकोनातून पाहावे. भारताला अनेक दशकांपासून सीमेपलीकडील दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. दहशतवाद्यांनी हजारो निष्पाप लोकांची हत्या केली आहे. आमच्या संसदेलाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. दहशतवादी खासदारांना ओलीस घेऊन त्यांचा खात्मा करण्याच्या तयारीत होते. अशा अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत भारत इथपर्यंत पोहोचला आहे. संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त आहे. मात्र, दहशतवादाच्या परिभाषेबाबत एकमत होत नाही हे दुःखद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्लीत आयोजित जी-२० संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. हे संमेलन एक प्रकारे जगभरातील संसदीय प्रक्रियांचे महाकुंभ आहे. शांतता, बंधुभाव जोपासण्याचा काळ असून, सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

दहशतवाद हे मोठे आव्हान, याची जगालाही जाणीव

दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे, हे आता जगालाही पटू लागले आहे. जगभरात कुठेही दहशतवाद घडो, त्याचे कारण, स्वरुप काहीही असो, तो मानवतेच्या विरोधातच असतो. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी दहशतवादाबाबत सातत्याने कठोर राहावे. दहशतवादाच्या व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक आहे. दहशतवादासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनांमध्ये एकमत व्हायला हवे. दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात आपण एकत्र कसे काम करू शकतो, याचा विचार जगभरातील संसद आणि प्रतिनिधींना करावा लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

दरम्यान, भारताची संसदीय प्रक्रिया काळानुरूप सुधारली आहे. दहशतवादाविरुद्ध भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही सुद्धा भारतात आहे. हे चर्चेसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. तसेच, भारतातील सार्वत्रिक निवडणुका एखाद्या सणासारख्या असतात. स्वातंत्र्यानंतर भारतात १७ सार्वत्रिक निवडणुका आणि ३०० हून अधिक विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNew Delhiनवी दिल्ली