शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी वायनाडमध्ये भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिली, पीडितांशीही चर्चा केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 18:47 IST

हवाई पाहणीनंतर पीएम मोदींचे हेलिकॉप्टर कलपेट्टा येथील एसकेएमजे विद्यालयात उतरले. येथून ते रोडने चुरलमला येथे रवाना झाले.

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलन झालेल्या ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यांनी चुरलमला येथे जाऊन आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पीएम मोदी कन्नूर विमानतळावरून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने वायनाडला पोहोचले. ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या चुरलमला परिसरात  नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे भूस्खलनग्रस्त चुरलमाला, मुंडक्काई आणि पंचिरिमट्टमचे हवाई पाहणी केली होती.

"मी कधीच असं सांगितलं..."; परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई पाहणीनंतर पीएम मोदींचे हेलिकॉप्टर कलपेट्टा येथील एसकेएमजे विद्यालयात उतरले. येथून ते रस्त्याने चुरलमला येथे रवाना झाले. चुरलमला येथे, आपत्तीनंतर मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्कराने १९० फूट लांबीचा बेली ब्रिज बांधला आहे. नुकसानीचा आढावा घेताना मोदी या पुलावरून पायी गेले. पीएम मोदींनी बचाव कर्मचारी, राज्याचे मुख्य सचिव व्ही वेणू आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केंद्रीय पर्यटन आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी हेही त्यांच्यासोबत होते. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी,हवाई सर्वेक्षणादरम्यान त्यांना भूस्खलनाचा केंद्रबिंदू सापडला, जो इरुवाझिंजी पुझा (नदी) च्या उगमस्थानी आहे. त्यांनी पुनचिरीमट्टम, मुंडक्काई आणि चुरलमाला या सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांचा आढावा घेतला. 

केरळमधील वायनाड जिल्ह्यात ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात २२६ लोकांचा मृत्यू झाला होता. या परिसरात अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत.

वायनाड दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० जुलै रोजी बैठक घेऊन आढावा घेतला होता. त्यांनी एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल आणि नौदलाला मदत आणि बचाव कार्यात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या. लष्कर आणि केंद्रीय दलाच्या तिन्ही सेवांचे तसेच अग्निशमन दल आणि नागरी संरक्षणाचे १२०० हून अधिक जवान घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात होते. केंद्राने या भागाला भेट देण्यासाठी एक आंतर-मंत्रालयीन पथकही पाठवले आहे, हे ८ ऑगस्टपासून भेट देत आहे आणि बाधित भागातील नुकसानीचा आढावा घेत आहे.

टॅग्स :wayanad-pcवायनाडNarendra Modiनरेंद्र मोदी