शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

५० हजार कोटींच्या रोजगार योजनेचा उद्या प्रारंभ; सहा राज्ये लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:05 IST

११६ जिल्ह्यांत स्थलांतरित कामगारांना मिळेल काम

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर विविध राज्यांतून आपापल्या घरी परतलेल्या स्थलांतरित कामगारांच्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून पंतप्रधान मोदी हे शनिवारी ५० हजार कोटी रुपयांची रोजगार योजना सुरू करणार आहेत.या योजनेचे नाव ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ असे असून, ती प्रामुख्याने प्रारंभी सहा राज्यांत राबवली जाईल. या सहा राज्यांत बहुतांश स्थलांतरित कामगार परतले आहेत. या योजनेतून ग्रामीण भागांत फार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कामे केली जातील. त्यातून १२५ दिवस स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत येथे सांगितले. मोदी या योजनेचा प्रारंभ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यातील तेलिहार खेड्यात त्याची सुरुवात होईल. या योजनेत पश्चिम बंगालचा समावेश का नाही, असे विचारले असता ग्रामीण विकास सचिव एन.एन. सिन्हा म्हणाले, जेव्हा हा कार्यक्रम बनवण्यात आला तेव्हा प. बंगालने त्यांच्याकडे किती स्थलांतरित कामगार आले याची माहितीच दिली नव्हती. २५ हजार स्थलांतरित कामगार असलेला कोणताही जिल्हा या योजनेत सहभागी होऊ शकतो. जर आमच्याकडे पुरेशी संख्या आली, तर आम्ही त्यांचा त्यात समावेश करू, असेही ते म्हणाले.बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, ओदिशाचा समावेशबिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओदिशा राज्यांतील (प्रत्येकी २५ हजार स्थलांतरित कामगार) ११६ जिल्ह्यांची या मोहिमेसाठी निवड झाली आहे, असे सीतारामन म्हणाल्या. या जिल्ह्यांत एकूण स्थलांतरित कामगारांपैकी दोनतृतीयांश कामगार आहेत.या योजनेतून १२५ दिवस स्थलांतरित कामगारांना रोजगार देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची २५ कामे केली जातील. रोजगार देण्यासह ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचाही उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या