शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

५० हजार कोटींच्या रोजगार योजनेचा उद्या प्रारंभ; सहा राज्ये लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:05 IST

११६ जिल्ह्यांत स्थलांतरित कामगारांना मिळेल काम

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर विविध राज्यांतून आपापल्या घरी परतलेल्या स्थलांतरित कामगारांच्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून पंतप्रधान मोदी हे शनिवारी ५० हजार कोटी रुपयांची रोजगार योजना सुरू करणार आहेत.या योजनेचे नाव ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ असे असून, ती प्रामुख्याने प्रारंभी सहा राज्यांत राबवली जाईल. या सहा राज्यांत बहुतांश स्थलांतरित कामगार परतले आहेत. या योजनेतून ग्रामीण भागांत फार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कामे केली जातील. त्यातून १२५ दिवस स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत येथे सांगितले. मोदी या योजनेचा प्रारंभ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यातील तेलिहार खेड्यात त्याची सुरुवात होईल. या योजनेत पश्चिम बंगालचा समावेश का नाही, असे विचारले असता ग्रामीण विकास सचिव एन.एन. सिन्हा म्हणाले, जेव्हा हा कार्यक्रम बनवण्यात आला तेव्हा प. बंगालने त्यांच्याकडे किती स्थलांतरित कामगार आले याची माहितीच दिली नव्हती. २५ हजार स्थलांतरित कामगार असलेला कोणताही जिल्हा या योजनेत सहभागी होऊ शकतो. जर आमच्याकडे पुरेशी संख्या आली, तर आम्ही त्यांचा त्यात समावेश करू, असेही ते म्हणाले.बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, ओदिशाचा समावेशबिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओदिशा राज्यांतील (प्रत्येकी २५ हजार स्थलांतरित कामगार) ११६ जिल्ह्यांची या मोहिमेसाठी निवड झाली आहे, असे सीतारामन म्हणाल्या. या जिल्ह्यांत एकूण स्थलांतरित कामगारांपैकी दोनतृतीयांश कामगार आहेत.या योजनेतून १२५ दिवस स्थलांतरित कामगारांना रोजगार देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची २५ कामे केली जातील. रोजगार देण्यासह ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचाही उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या