शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

UCC संदर्भात मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय! ‘या’ ४ मंत्र्यांना दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 11:43 IST

UCC विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.

UCC Modi Govt: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी संहिता विधेयक सादर करण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा मानस असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यापूर्वी मोदी सरकारने समान नागरी संहितेवर काम करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष किरेन रिजिजू असतील. तर या समितीत स्मृती इराणी, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन राम मेघवाल हे सदस्य असणार आहे. या समितीतील मंत्र्यांची एक बैठक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

हे केंद्रीय मंत्री समान नागरी संहितेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. आदिवासी समाजाच्या मुद्द्यांवर किरेन रिजिजू, स्मृती इराणी महिला अधिकारांशी संबंधित मुद्द्यांवर, जी किशन रेड्डी ईशान्येकडील राज्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. याशिवाय कायदेशीर पैलूंवरही चर्चा केली जाणार आहे. या मंत्र्यांनी यासंदर्भात ईशान्येकडील काही मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. 

UCCसाठी केंद्रातील मोदी सरकार गंभीर

समान नागरी संहितेच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दिशेने केंद्र सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. भोपाळमध्ये भाजप बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी समान नागरी संहितेचा पुरस्कार केला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या संदर्भात काही मंत्र्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली.

दरम्यान, समान नागरी संहिता हा भारतीय संविधानाच्या कलम ४४ चा भाग आहे. संविधानातील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता लागू करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे घटनेच्या कलम ४४ मध्ये नमूद करण्यात आले आहे. अनुच्छेद ४४ हे उत्तराधिकार, संपत्तीचे अधिकार, विवाह, घटस्फोट आणि मुलांचा ताबा यासंबंधी समान कायद्याच्या संकल्पनेवर आधारित आहे.

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाCentral Governmentकेंद्र सरकार