शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Independence Day: जाणून घ्या काय आहे 'जल जीवन मिशन'?; मोदी सरकार खर्च करणार 3.5 लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 11:04 IST

स्वच्छ भारतनंतर मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली: स्वातंत्र्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. या भाषणात मोदींनी पेयजल सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत जल जीवन मिशनची घोषणा केली. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच जल जीवन मिशनदेखील जन चळवळ व्हावी, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. पुढील पिढ्यांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. आज देशातील निम्म्याहून अधिक घरांमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. त्यांच्या आयुष्यातील बराच वेळ स्वच्छ पाणी मिळवण्यात जातो. त्यामुळे सरकारनं प्रत्येक घरात पिण्याचं पाणी पोहोचवण्याचा संकल्प केला आहे, असं मोदी म्हणाले. येणाऱ्या दिवसांमध्ये जल जीवन मिशनला पुढे घेऊन जाऊ. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं सोबत काम करतील. यासाठी सरकारकडून साडे तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मोदींनी दिली.  पावसाचं पाणी अडवणं, सूक्ष्म सिंचन, जल संवर्धन, जागरुकता, लहान मुलांना पाण्याचं महत्त्व पटवून देणं अशा विविध बाबींचा जल जीवन मिशनमध्ये समावेश असेल. पेयजल सुरक्षेवर भाष्य करताना मोदींनी जैन मुनी महुडींचा संदर्भ दिला. भविष्यात पाणी किराणा मालाच्या दुकानात विकलं जाईल, असं महुडींनी म्हटलं होतं. त्यांची ती भविष्यवाणी खरी ठरली. आज आपण दुकानातून पाणी खरेदी करतो, असं मोदींनी सांगितलं. जल जीवन मिशन केवळ सरकारी अभियान न राहता, ते जनआंदोलन व्हावं, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिनSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान