शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेच्या नियमांमध्ये सरकारने केले मोठे बदल, लाभार्थ्यांवर होणार असा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 19:38 IST

PM Awas Yojana: जर तुम्हीही पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेचा लाभ घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत, या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते.

नवी दिल्ली - जर तुम्हीही पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेचा लाभ घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत, या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते.

सरकारने केलेल्या नव्या नियमांनुसार, सरकार आता पहिली पाच वर्षे तुम्ही त्या घरात राहता की नाही याची पाहणी करणार आहे. जर तुम्ही या घरात राहत असाल तरच या कराराला लीज डीडमध्ये बदललं जाईल. अन्यथा नव्या नियमांतर्गत विकास प्राधिकरण तुमच्यासोबत केलेला करार रद्द करेल. तसेच तुम्हाला तुमची रक्कमही परत मिळणार नाही. एकंदरीत आता यामध्ये होणारी गडबड बंद होणार आहे.

त्याबरोबरच शहरी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बनवण्यात येत असलेले फ्लॅटही आता फ्री होल्ड असणार नाहीत. म्हणजेच पाच वर्षांनंतरही लोकांना लीजवर राहावं लागेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर घेऊन नंतर ते भाड्याने देतात, अशा लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतील नियमांनुसार जर कुठल्या लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याची संपत्ती ही कुटुंबातीच सदस्यांनाच लीज हस्तांतरीत होईल. सरकार कुठल्या अन्य कुटुंबांसह कुठलेही अॅग्रिमेंट करणार नाही. या अॅग्रिमेंटनुसार लाभार्थ्यांना पाच वर्षांपर्यंत घराचा वापर करावा लागेल. त्यानंतर आवासची लीज परत केली जाईल.  

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाCentral Governmentकेंद्र सरकार