शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

खट्टर यांच्यावर पंतप्रधान नाराज, सर्व स्तरांतून राजीनाम्याची मागणी, शहांनी राज्यांच्या नेत्यांना घेतले बोलावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:31 IST

बाबा राम राहीमच्या हिंसक समर्थकांना संरक्षण दिल्याचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर सर्व स्तरांतून होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे.

नवी दिल्ली/चंदीगड : बाबा राम राहीमच्या हिंसक समर्थकांना संरक्षण दिल्याचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर सर्व स्तरांतून होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. खट्टर यांच्यामुळे आपण स्वत: व भाजपा अडचणीत आल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही खट्टर यांच्यावर अतिशय नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.मुख्यमंत्र्यांमुळे केंद्र सरकार व स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शनिवारी पंजाब व हरियाणा न्यायालयाची बोलणी खावी लागली. कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे, असे केंद्रातर्फे न्यायालयात सांगण्यात आले, तेव्हा हरियाणा हा देशाचा भाग नाही का? असा सवालच न्यायालयाने केला. एवढेच नव्हे, तर मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, भाजपाचे नाहीत, अशे ताशेरेही न्यायालयाने मारलेत्यामुळे खट्टर यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षातूनच होऊ लागली आहे. त्यामुळे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून हरियाणातील पक्षाच्या नेत्यांशी शनिवारी चर्चा केली.बाबा राम रहीमला न्यायालयात नेताना जे जादा संरक्षण देण्यात आले, दोषी ठरविण्यात आल्यानंतर, ज्या प्रकारे हेलिकॉप्टरने नेण्यात आले, रोहतकच्या तुरुंगात जी विशेष वागणूक देण्यात आली, त्याच्या सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठ अधिकाºयाला मारहाण, धक्काबुक्की केली, त्याच्या बातम्या पसरल्यामुळे हरियाणातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पंचकुलातील रहिवासीही मुख्यमंत्र्यांवर चिडले आहेत. आमच्या सुरक्षेसाठी सरकारने काहीच केले नाही आणि संपूर्ण शहर पेटू दिले, आम्हाला जणू ओलीस धरण्यात आले, अशी टीका अनेक रहिवाशांनी केली आहे.लष्कराच्या २४ तुकड्या तैनातकालच्या घटनेनंतर ६00 हून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राम रहीमच्या सुरक्षा रक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याला आतापर्यंत झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती.तीही काढून घेण्यात आली आहे. हरियाणामध्ये लष्कराच्या एकूण २४ तुकड्या पंचकुला (१२), सिरसा (८) मानसा (२) व मानकोट (२) येथे तैनात आहेत.मात्र, त्या अद्याप कोणत्याही आश्रमात गेलेल्या नाहीत, त्यांना तशा सूचना नाहीत, असे लष्करी अधिकाºयांनी, तसेच हरियाणा सरकारने स्पष्ट केले.आश्रम सीलन्यायालयाने गंभीर दखल घेत, राम रहीमच्या स्थावर व जंगम अशा सर्व मालमत्तांची माहिती सरकारकडून मागविली. या मालमत्तांबाबत कोणतेही व्यवहार होता कामा नयेत, असे आदेशही दिले. हरियाणातील राम रहीमचे ३६ आश्रम सील करण्यात आले. तेथे लाठ्या, काठ्या व काही शस्त्रे सापडली. सिरसाच्या आश्रमातून बाबाचे अनुयायी बाहेर यायला तयार नव्हते. त्यांना बाहेर काढण्यात आले. राम रहीमचे पंजाबसह इतर ठिकाणी आश्रम असून, तिथेही कारवाई सुरू केली आहे.हिंसाचाराची कल्पना होतीकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज हरियाणातील पोलीस व प्रशासकीय अधिकाºयांची बैठक घेऊ न, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही उपस्थित होते. आम्ही हिंसाचाराची पूर्वकल्पना दिली होती, अशी माहिती इंटेलिजन्स ब्युरोने या बैठकीत राजनाथ सिंह यांना दिल्याचे समजते.या हिंसाचाराचा फटका पत्रकार व प्रसिद्धी माध्यमांना प्रमाणात बसला. अनेक पत्रकार व माध्यमांचे कर्मचारी यांना मारहाण झाली.काँग्रेसचे नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी मनोहरलाल खट्टर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परिस्थिती हाताळण्यात सरकार आणि मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे अपयश आले आणि त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ, हिंसाचार झाला, असे सांगून ते म्हणाले की, या साºयाला केवळ आणि केवळ मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अजिबात हक्क नाही. त्यांनी स्वत:हून राजीनामा न दिल्यास, केंद्र सरकारने त्यांचे सरकार बरखास्त करावे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही हुड्डा यांनी केली.उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपाच्या नेत्या मायावती यांनीही मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही खट्टर यांना हटविण्याची मागणी केली आहे.