शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ममतांना ठार मारण्याचाच कट होता, तृणमूलचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 05:43 IST

तृणमूलचा आरोप; भाजप, काँग्रेसला हल्ल्याविषयीच शंका

कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने स्वीकारली पाहिजे. त्यांना ठार मारण्याचा कट होता, असा आरोप गुरुवारी तृणमूल काँग्रेसने गुरूवारी केला. निवडणूक काळात राज्यातील कायदा-व्यवस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. दुसºया राज्यांतून समाजकंटक नंदीग्रामला आणून हिंसाचार घडविण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे असेही तृणमूलच्या नेत्यांनी बोलून दाखविले.या हल्ल्याप्रकरणी तृणमूल व भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांची भेट घेतली. या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली.   मात्र ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करतानाच प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, मते मिळवण्यासाठी ममतांनी हे नाटक केले नाही ना, हे तपासायला हवे. त्यांची अशी नाटके जनतेने याआधी पाहिली आहेत. भाजपचे दोन नेते त्यांच्या या विधानानंतर  ममता बॅनर्जी यांची विचारपूस करायला रुग्णालयातही गेले. राज्यपाल जगदीप धनखड यांनीही काल रुग्णालयात जाऊ न प्रकृतीची चौकशी केली.

हल्ल्याच्या ठिकाणची पाहणी बॅनर्जी यांच्यावर जिथे हल्ला झाला, त्या ठिकाणी नंदीग्राम जिल्हाधिकारी विभू गोयल, पोलीस अधीक्षक प्रवीण प्रकाश व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी भेट दिली. या घटनेच्या साक्षीदारांकडून या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली आणि हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले.

पटनायक यांना चिंताया हल्ल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चिंता व्यक्त केली आहे. ममता यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकwest bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१