शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात धर्तीवर कचरा उचलण्याचे नियोजन हवे पारंपरिक पद्धतीवर भर: स्मार्ट नियोजनाची आहे गरज

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

सोलापूर : शहरातील कचरा उचलण्यासाठी पारंपरिक पद्धतीवरच भर दिला जात आहे. आता सोलापूरची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झाल्याने गुजरातच्या धर्तीवर कचर्‍याचे विल्हेवाट लावण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

सोलापूर : शहरातील कचरा उचलण्यासाठी पारंपरिक पद्धतीवरच भर दिला जात आहे. आता सोलापूरची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झाल्याने गुजरातच्या धर्तीवर कचर्‍याचे विल्हेवाट लावण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.
लोकमतने सोलापुरातील कचर्‍याच्या समस्येकडे मालिकेद्वारे लक्ष वेधल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरची ओळख होण्यासाठी अगोदर कचर्‍याची विल्हेवाट होणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे. यात नागरिकांचाही सहभाग मोठा आहे. नागरिकांची स्वयंशिस्त व आरोग्य विभागाचे सूक्ष्म नियोजन यांची सांगड घातल्याशिवाय शहर स्वच्छ होणार नाही. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी कचर्‍याच्या विल्हेवाटसाठी नागरिकांकडून कचरा खरेदीचा प्रस्ताव मांडला आहे. कचरा गोळा करण्यासाठी गुजरातमधील सुरत महापालिकेने राबविलेल्या यंत्रणेचा मॉडेल म्हणून उपयोग करता येईल. घंटागाड्यांचे नियोजन, गोळा केलेला कचरा वजन करून थेट डंपरमध्ये घालण्यासाठी विभागनुसार खास डंपिंग स्टेशन स्थापन केले आहेत. यामुळे घंटागाड्यांचा कमी प्रवास, जास्त वजन वाहनक्षमता वाढते. कचर्‍याच्या वजनात गडबडी होत नाहीत व न सांडता कचर्‍याची वाहतूक होते.
शहरात कुंड्यात टाकलेला कचरा मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर येतो. तसेच भरलेले कंटेनर वेळेवर उचलले जात नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. गेल्या सहा महिन्यात वेगाने वाहणारे वारे व वेळेत कचरा न उचलल्याने सर्वत्र प्लास्टिक पिशव्या, कापड, कागद विखुरल्याने सौंदर्याला बाधा आली आहे. आरोग्य विभाग कचरा उचलण्यासाठी पूर्वीपासून प्रचलित असलेल्या यंत्रणेचा वापर करीत आहे. ज्या ठेकेदारांना काम दिले आहे, ते ठेकेदार सफाई मजुरांना साहित्य पुरवित नसल्याचे दिसून येते. फावडे किंवा हातानेच कचरा भरला जातो, अन्यथा आता थेट जेसीबीचा वापर सुरू झाला आहे. यापेक्षा वेगळी अत्याधुनिक यंत्रणा ताफ्यात दाखल होणे गरजेचे झाले आहे.
इन्फो..
आयुक्त झाले अस्वस्थ
कचर्‍याच्या समस्येमुळे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील हे अस्वस्थ झाले आहेत. बुधवारी त्यांनी याबाबत काय काय उपाययोजना राबविता येतील, यावर विचारविनिमय केला. भोगाव येथील कचरा डेपोशेजारी कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पास महापालिका ओला कचरा पुरविते, पण अलीकडे कचरा उचलण्याची यंत्रणा ढेपाळल्याने कंपनीने स्वत:ची यंत्रणा उभारून हॉटेल व मंडईतील कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीने शहरातील कचरा उचलण्याबाबत सर्वेक्षण करावे, अशी सूचना आयुक्तांनी संचालकांना केली आहे.