शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

नियोजन आयोग इतिहासजमा !

By admin | Updated: December 8, 2014 03:17 IST

तब्बल ६४ वर्षांपूर्वीचा नियोजन आयोग गुंडाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्गठित राष्ट्रीय योजना आणि सुधारणा आयोगात (एनपीआरसी) राज्यांच्या सक्रिय सहभागाचे गाजर दाखविले आहे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीतब्बल ६४ वर्षांपूर्वीचा नियोजन आयोग गुंडाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्गठित राष्ट्रीय योजना आणि सुधारणा आयोगात (एनपीआरसी) राज्यांच्या सक्रिय सहभागाचे गाजर दाखविले आहे. स्व. पं. जवाहरलाल नेहरूंच्या कल्पनेतून साकारलेला हा आयोग गुंडाळू नये, असे काँग्रेस आणि समविचारी पक्षांना वाटत असले, तरी रविवारी मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या बैठकीत बहुतांश मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या पुनर्गठनाच्या कल्पनेला समर्थन दिले. त्यामुळे हा आयोग इतिहासजमा झाल्याची फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. योजना आयोगाचे नाव काय राहणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. विविध पोर्टल्सच्या माध्यमातून लाखो सूचना आणि शिफारशी मिळाल्या, असे संकेत पंतप्रधानांनी दिले असले तरी कोणतीही घोषणा केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविलेले नाव पाहता रालोआला काय हवे, त्याचे संकेत मिळतात. १९५० मध्ये पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी निर्माण केलेली ही संस्था गुंडाळली जावी, असे काँग्रेस आणि समविचारी पक्षांना वाटत नाही. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चेतून तेच दिसून आले. तामिळनाडू (अण्णा द्रमुक), ओडिशा (बिजद), तेलंगणा (टीआरएस) आणि ईशान्येकडील काही बिगर रालोआ सरकार असलेल्या राज्यांनी एकप्रकारे समर्थन देत मोदींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे. मोदींनी परिषद संपताच आयोगासंबंधी बैठक यशस्वी ठरल्याचा दावा केला. आपल्या सात रेसकोर्स निवासस्थानी २९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दिवसभर चर्चा करताना मोदींनी देशाची अर्थव्यवस्था आणि विकासासाठी सुधारित नवे मंडळ ‘टीम इंडिया’प्रमाणे कसे काम करील, याचे उत्साहात विवेचन केले. योजना आयोगाची पुनर्रचना करताना मोदींनी सांघिकतेवर भर दिला आहे. जुन्या योजना आयोगाच्या संकल्पनेत ही केंद्र सरकारची संस्था असून, त्यात राज्यांच्या भूमिकेला वाव नाही. या आयोगाच्या प्रस्तावांना तसेच पंचवार्षिक योजनेला मंत्रिमंडळ तसेच राष्ट्रीय विकास परिषदेच्या मान्यतेची गरज होती. मोदींनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचेही मन वळविण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या सुधारणा काळाबाबत आयोगाकडे भविष्याचा दृष्टिकोन नाही, या डॉ. मनमोहन सिंग यांच्या भूमिकेचे स्मरण देत मोदी म्हणाले, की डॉ. सिंग यांनाही आयोगाची पुनर्रचना केली जावी असे वाटत होते.