शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांचा हल्ला नियोजनबद्ध, पाकिस्तानचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 07:25 IST

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला हल्ला अतिशय निंदनीय आहे. या हल्ल्याची योजना दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होती. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता आहेच.

- दत्तात्रय शेकटकर,लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला पुलवामा हल्ला अतिशय निंदनीय आहे. या हल्ल्याची योजना दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होती. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता आहेच. तसेच स्थानिकांचाही यात सहभाग नक्कीच आहे. यामुळे सर्जिकल स्ट्राइक ही केवळ पाकिस्तानात करून चालणार नाही. जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवरही करणे महत्त्वाचे आहे. यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवे.जम्मू काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे. पाकिस्तानचा हात या मागे नक्कीच आहे. मात्र, हल्ल्यात वापरलेली कार ही स्थानिक नागरिकाची असल्याने स्थानिक दहशतवाद्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानकडून मिळणारा पैसा आणि राजकीय हव्यासापोटी काही स्थानिक नेत्यांनीही या हल्ल्यासाठी मदत केली असेल, हे मी खात्रीने सांगू शकतो. यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांऐवजी स्थानिक दहशतवादी आता घातक होऊ लागले आहे. त्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक जवानांनी दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे. यामुळे आता अजून किती मुलींना आपण विधवा होताना पाहायचे आहे. राष्ट्राच्या सहनशक्तीची एक सीमा असते. यामुळे आता भारत सरकारने सैन्यांना अशा विरोधात थेट कारवाईचे आदेश देण्याची वेळ आली आहे. ‘हमले का जवाब हमले से’ देण्याची वेळ आली आहे. भारतीय नागरिकांच्या, जवानांच्या जीवाचे मूल्य एवढे स्वस्त नाही. दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइकची मागणी सातत्याने केली जाते. पाकिस्तानच्या भूमीवरून जे दहशतवादी कार्य करतात, त्यांना ठार करणे हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे की, जम्मू काश्मीरच्या भूमिवरून भारताविरोधात कारवाई करणाऱ्या दशहतवाद्यांवरही कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे देशाने दहशतवाद्यांच्या विरोधात निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यासाठी संपूर्ण राष्ट्राने एकत्र येणे गरजेचे असून सरकारला यासाठी पाठिंबा द्यायला हवा.----------------------अनेक दिवसांपासून अशा प्रकारचे हल्ले सुरू आहेत. त्याला चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे.- संतोष भोसले, असिस्टंट कमांडर, केंद्रीय राखीव पोलीस दलअतिरेकी हल्ल्यासाठी संधी शोधत असतात. त्यांना प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे.- बी. के. टोप्पो, निवृत्त जवान, केंद्रीय राखीव पोलीस दल

जम्मू काश्मीरमध्ये आजही अनेक फुटीरतावादी आणि दहशतवादी गट कार्यरत आहेत. दहशतवाद्यांच्या विरोधात लष्करी कारवाया करून चालणार नाही, पण नवे ‘सायकॉलॉजिकल वॉर’ आपल्याकडून होणे गरजचे आहे. यात आपण कमी पडतोय. दहशतवाद्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. पण त्यांना मारून दहशतवाद संपणार नाही. यामुळे दहशतवाद निर्माण करणाºया संस्थांनाच संपवण्याची गरज आहे. यात चीन आणि इस्त्राएलचा आदर्श घेणे गरजेचे आहे.- बी. के. पंडित, माजी लेफ्टनंट जनरल

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर