शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

जवानांना नेणारा लष्कराचा ट्रक दरीत पाडायचा होता प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:39 IST

रियासी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा होता कट; अत्याधुनिक शस्त्रांनी होते सज्ज

सुरेश डुग्गर

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सर्वप्रथम परिसराची रेकी केली. रेकी करून हल्ल्यासाठी अशी जागा निवडली, जिथे वाहनांची गती ताशी १० ते १५ किलोमीटरपेक्षा जास्त राहू शकत नाही. त्यासाठी स्थानिक गाईडने मदत केली. गेल्या महिन्यात रियासीमध्ये झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती करून सैन्याला मोठे नुकसान पोहोचविण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.

दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी परिसराची माहिती घेत रेकी केली होती. कच्चा रस्ता असल्यामुळे लष्कराचे वाहन हळू जात होते. त्याच वेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यापूर्वीच्या हल्ल्यांप्रमाणे येथेही चालकाला लक्ष्य करण्यात आले. हा कट आखण्यासाठी स्थानिक गाईडने मदत केली होती. दहशतवाद्यांना जेवण दिले, तसेच आश्रयही दिला होता, असा दाट संशय तपास यंत्रणांना आहे.

दहशतवाद्यांकडे होती अत्याधुनिक शस्त्रे

दहशतवाद्यांनी डोंगराळ भाग निवडला. आधी सैन्याच्या ट्रकवर ग्रेनेड फेकला. त्यानंतर स्नायपर गनद्वारे गोळीबार केला. ९ जून रोजी रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसला लक्ष्य केले होते. त्याच प्रकारची योजना होती. त्यावेळी गोळीबारात चालकाला लक्ष्य केले होते. त्यानंतर बस दरीत कोसळली. मात्र, कालच्या हल्ल्यावेळी ट्रक खूप हळू होता. त्यामुळे तो दरीत कोसळला नाही. अन्यथा आणखी प्राणहानी झाली असती.

या हल्ल्यात ३-४ दहशतवाद्यांचा सहभाग होता. ते सर्व पाकिस्तानी होते. काही दिवसांपूर्वी घुसखोरी करून भारतात आले असावे. त्यांच्याकडे अमेरिकेत बनलेली एम-४ कार्बाईड रायफलसारखी अत्याधुनिक शस्त्रे होती. जास्तीत जास्त प्राणहानी झाली पाहिजे, अशा तयारीने त्यांनी कट रचला होता.

लष्कराच्या ताफ्यावर झालेला हल्ला, म्हणजे भाकड कृत्य आहे. याचा तीव्र निषेध करून कठोर प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. प्राणांची बाजी लावणाऱ्या शुरांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत - द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

दहशतवादी हल्ल्यात आपल्या पाच शूर सैनिकांच्या मृत्यूमुळे मला अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त्त करतो. या कठीण समयी संपूर्ण राष्ट्र त्यांच्यासोबत उभे आहे. -राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री.

३ महिन्यांपूर्वीच घरी लक्ष्मीचे आगमन

शहीद जवान विनोद सिंह भंडारी तीन महिन्यांपूर्वीच अठूरवाला या त्यांच्या गावी गेले होते. आज त्यांच्या गावात शांतता पसरली आहे. त्यांच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला होता. तिला पाहण्यासाठी ते घरी गेले होते. त्यांना ४ वर्षाचा मोठा मुलगा आहे. विनोद यांचे वडिलदेखील सैन्यात होते

दोन महिन्यांत दोन पुत्र गमाविले

शहीद आदर्श नेगी यांच्या कुटुंबीयांवर दुहेरी आघात झाला आहे. नेगी कुटुंबीयांनी दोन महिन्यांमध्ये दोन शूर पुत्र गमाविले आहेत. आदर्श यांचे चुलत भाऊ मेजर प्रणय हे लेह येथे तैनात होते. त्यांचे ३० एप्रिल रोजी निधन झाले. कुटुंबाला दोन महिन्यांत हा दुसरा धक्का बसला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान