शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 01:35 IST

नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोळसा मंत्री असलेले पीयूष गोयल यांच्या कथित घोटाळ्यावरून निर्माण झालेले वादळ शांत होण्याचे नाव नाही.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोळसा मंत्री असलेले पीयूष गोयल यांच्या कथित घोटाळ्यावरून निर्माण झालेले वादळ शांत होण्याचे नाव नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी टिष्ट्वट करून गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याआधीही काँग्रेस पक्षाकडून गोयल यांच्यावर सतत हल्ले करण्यात आले आहेत.काँग्रेसच्या या टीकेला भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटला पीयूष गोयल यांनी टिष्ट्वट करूनच प्रत्युत्तर दिले. ‘२६ मे २०१४ रोजी मंत्री बनण्याआधी मी एक व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट आणि इन्व्हेस्टमेंट बँकर होतो. तुमच्यासारखे कोणतेही काम न करता जीवन जगण्याची कला मी अद्याप तरी शिकलो नाही. मी एक कामदार आहे, नामदार नाही,’ असे गोयल यांनी म्हटले आहे.पीयूष गोयल यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये वापरलेले शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये केलेल्या भाषणामधून घेतले आहेत. कर्नाटकमधील लढाई ही कामदार विरुद्ध नामदार अशी असल्याचे सांगून मोदी यांनी राहुल गांधी यांना ‘नामदार’ श्रेणीत ठेवले होते. ‘राहुलजी, तुम्ही नामदार आहात तर आम्ही कामदार. आम्ही तुमच्यासमोर बसूच शकत नाही,’ असे मोदी म्हणाले होते.४८ कोटी रुपयांचा घोटाळा हा निश्चितपणे पीयूष गोयल यांच्या हिताशीच संबंधित आहे. कारण त्या वेळी ते ऊर्जामंत्री होते. गोयल यांनी आपले शेअर अशा व्यक्तीला विकले की ज्याची ऊर्जा क्षेत्रात रुची होती आणि या व्यक्तीने कंत्राट घेऊन त्याचा लाभ उचलला, असा स्पष्ट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.राहुल गांधी यांनी मीडियावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, पत्रकारांनी सत्याच्या बाजूने उभे राहायला पाहिजे होते. परंतु ते याबाबत काहीच बोलत नाहीत.गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्ष गोयल यांच्याशी संबंधित या ४७ कोटींच्या घोटाळ्यावर बोलत आहे आणि गोयल त्याला सातत्याने प्रत्युत्तर देत आहेत. मात्र मीडियाने या वाक्युद्धाकडे दुर्लक्ष केल्याने राहुल गांधी यांनी मीडियावर हे ताशेरे ओढले. कर्नाटकमध्ये आयोजित प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधी हे गोयल यांच्या कथित घोटाळ्यावर भाष्य करीत आहेत. सोबतच येदियुरप्पा यांच्या घोटाळ्यांचा उल्लेखही ते आपल्या सभेत करताना दिसत आहेत.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलRahul Gandhiराहुल गांधी