शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस, दबाव टाकून घेतली पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:21 IST

पीएचडीची पदवी घेणा-या व्यक्तीकडे त्या संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असेलच असे नाही. बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाला आहे.

- दीपक जाधव रेनिगुंठा, (आंध्र प्रदेश) : पीएचडीची पदवी घेणा-या व्यक्तीकडे त्या संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असेलच असे नाही. बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाला आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी अशीच बोगस आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी गुरुवारी जाहीर भाषणात केला. त्यामुळे ते मंत्री नेमके कोण, याच्या चर्चांना उधाण आले आहे.पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आंध्र प्रदेशातील तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्यात आलेल्या ‘फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंग’चे उद्घाटन डॉ. सिंह यांच्या हस्ते केले. सोसायटीचे अध्यक्ष शाहू छत्रपती महाराज, नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, माजी कार्यवाह प्रा. आनंद भिडे, एमसीएचएलचे संचालक डॉ. सचिन खेडकर, डॉ. मोहन स्वामी, वेंकटेश्वरा विद्यापीठाचे कुलगुरू ए. दामोधरम, पद्मावती महिला विद्यापीठाच्या प्रा. दुर्गा भवानी उपस्थित होते.डॉ. सिंह म्हणाले, ‘पीएचडीची पदवी घेतलेल्या अनेकांना पीएचडी शब्दाचा लॉँगफॉर्मही सांगता येत नाही. त्या त्या विषयाचे व्यवस्थित आणि सविस्तर ज्ञान नसताना देखील पदवी घेऊन बसले आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याने अशाच प्रकारे बोगस पीएचडी पदवी मिळवली आहे. त्या मंत्र्यानी मला त्यांनी पीएचडी केलेल्या विषयाची माहिती दिली होती, मात्र तो विषय इथे सांगण्या लायकदेखील नाही.’ त्या मंत्र्यानी ज्या विद्यापीठातून ही पदवी मिळवली होती, तिथल्या संबंधित विभागाच्या प्रमुखांना मी फोन केला. या विषयात पीएचडी करण्यास तुम्ही मान्यताच कशी दिली, अशी विचारणा मी त्यांना केली होती. तेव्हा वरिष्ठ पातळीवरून त्या विषयाला मान्यता आणि त्याचबरोबर पदवी देण्यास माझ्यावर दबाव आल्याचे त्यांनी सांगितले, अशी धक्कादायक माहिती सत्यपाल सिंह यांनी दिली. केवळ महाराष्ट्र नाही तर उत्तर प्रदेशातदेखील असे प्रकार होत आहेत. त्याचबरोबर नुकतेच दिल्लीमध्ये बोगस पदवी विकणाºया रॅकेटचा पर्दाफाश झाला असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान तो मंत्री कोण, याबाबत डॉ. सत्यपाल सिंह यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मात्र माझे नाव ‘सत्य’पाल आहे, असे म्हणून मी जे बोलतो ते खरंच बोलतो, असा निर्वाळा त्यांनी दिला.>डार्विनबाबच्या विधानामुळे चर्चेला सुरुवातडार्विन यांच्या सिद्धान्ताबाबत सत्यपाल सिंह यांनी केलेल्या विधानामुळे देशभर प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी माझे वैयक्तिक मत मांडले होते. मी देखील विज्ञानाचा विद्यार्थी होतो आणि आहे. विज्ञान हे विविध प्रकारच्या चर्चा आणि विरोधातून वाढते. माझ्या विधानामुळे या विषयावरील चर्चेला तोंड फुटले, असे मत मांडणारा मी पहिला नाही, यापूर्वीही अनेकांनी असे मत व्यक्त केले आहे. मी केलेल्या विधानानंतर मात्र त्यावर प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी परिसंवादांचेही आयोजन केले. या निमित्ताने चर्चेला सुरुवात झाली ही चांगली गोष्ट आहे.’’