शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

अंगणवाडी, आशा प्रकल्प व माध्यान्न भोजनाच्या कर्मचाऱ्यांना पीएफ

By admin | Updated: August 18, 2016 06:10 IST

अंगणवाडी, आशा प्रकल्प व माध्यान्न भोजन योजनेत काम करणारे जवळपास ५0 लाख सेवक, सेविका व कर्मचाऱ्यांना लवकरच प्रॉव्हिडंड फंड व आरोग्य सेवा योजनेचा लाभ मिळणार आहे.

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

अंगणवाडी, आशा प्रकल्प व माध्यान्न भोजन योजनेत काम करणारे जवळपास ५0 लाख सेवक, सेविका व कर्मचाऱ्यांना लवकरच प्रॉव्हिडंड फंड व आरोग्य सेवा योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रस्तुत निर्णय सामाजिक सुरक्षा योजनांच्या परिघात आणण्याचे मोदी सरकारने ठरवले आहे. येत्या २२आॅगस्ट रोजी या संदर्भात सरकारतर्फे महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.अर्थमंत्री अरूण जेटली, सेंट्रल ट्रेड युनियन व भारतीय मजदूर संघ यांची या मागण्यांच्या संदर्भात मंगळवारी एक बैठक झाली. अंगणवाडी,आशा प्रकल्प व माध्यान्न भोजन योजनेत काम करणाऱ्या तमाम कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंड फंड व आरोग्य सेवेचा लाभ देण्याची मागणी त्यात सरकारने मंजूर केली व येत्या २२ आॅगस्ट पूर्वी या संदर्भात आदेश जारी करण्याचे आश्वासन दिले. बहुदा अर्थमंत्री २२ आॅगस्ट रोजी भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर आणखी एक बैठक करतील व या निर्णयाची त्यानंतरच अधिकृतरित्या घोषणा होईल, असे सूत्रांकडून समजले.सरकारी आकडेवारीनुसार २0१४ साली देशात २४.५८ लाख महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. आशा प्रकल्पात काम करणाऱ्यांची संख्या साधारणत: १0 लाख आहे तर माध्यान्न भोजन योजनेत सुमारे १५ लाख कर्मचारी काम करतात. भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाला अर्थमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार , सेवक, सेविका व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) व्दारे प्रॉव्हिडंड फंड व एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स (ईएसआयसी) व्दारे आरोग्य सेवा पुरवण्याचा सरकारचा विचार आहे. याखेरीज असंघटीत क्षेत्रातले आॅटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक इत्यादी आता फक्त १00 रूपये भरून ईएसआयसीचे सदस्य बनू शकतील. यापूर्वी असंघटीत क्षेत्रात या वर्गासाठी ईएसआयसी चे सदस्यत्व २५0 रूपयांना देण्याचा प्रस्ताव होता. नव्या प्रस्तावात सरकारने या वर्गासाठी प्रत्येकी १00 रूपये सरकारी तिजोरीतून भरण्याची तयारी दर्शवली आहे.भारतीय मजदूर संघाला लाभ मिळवून देण्याचे प्रयत्नकामगार क्षेत्रात कार्यरत असलेली संघपरिवाराची शाखा भारतीय मजदूर संघाने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांवर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर त्याविरूध्द संघर्ष करण्याचा इशाराही दिला आहे. अर्थमंत्री जेटलींबरोबरच्या बैठकीपूर्वी संघर्षाचे कोणतेही अस्त्र न उचलण्याचा निर्णय या संघटनेने घेतला होता.अपेक्षेनुसार २२ आॅगस्ट रोजी अर्थमंत्र्यांनी उपरोक्त घोषणा केली तर या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळवून देण्याचे श्रेय, अर्थातच भारतीय मजदूर संघाला मिळणार आहे.