शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या ५ वर्षांत देशातून पेट्रोल होणार हद्दपार; विहिरीतील पाण्यात 'अविष्कार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:34 IST

‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन नितीन गडकरी यांचा सन्मान, इथेनॉलच्या एका निर्णयाने देशातील २० हजार कोटींची बचत झाली. येत्या काळात दुचाकी, चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीवर चालणार आहेत.

अकोला : आता गाड्यांमध्ये विदर्भात तयार केलेल्या बायो इथेनॉलचा वापर होत आहे. विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन तयार करून ७० रुपये प्रतिकिलो विक्री होऊ शकते. त्याच्या अधिक वापरामुळे भविष्यात कोणी पेट्रोल-डिझेलचा वापर करणार नाही. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल हद्दपार होईल. आता गहू, तांदूळ, मका लावून कोणी भविष्य बदलू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नदाता नाही, ‘ऊर्जा’दाता बनण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षान्त समारंभ गुरुवारी पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी, सन्माननीय अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. मोतीलाल मदान, कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे उपस्थित होते. कृषी विद्यापीठाकडून गडकरी यांना यावेळी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात आले.

गडकरी म्हणाले, इथेनॉलच्या एका निर्णयाने देशातील २० हजार कोटींची बचत झाली. येत्या काळात दुचाकी, चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीवर चालणार आहेत. विदर्भातील कापूस बांगलादेशात निर्यात करण्याची योजना बनविली असून, याकरिता विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक आहे. विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या पूर्णत: थांबविण्यासाठी विद्यापीठ मोठे सहकार्य करू शकते. 

‘विदर्भाचे शेतकरीही माल निर्यात करू शकतात!’ मुंबईसारखी भक्कम आर्थिक राजधानी असलेल्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतात, हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी नोकरीच्या मागे न लागता, शेती विकासाला प्राध्यान्य देण्याची आवश्यकता आहे. जळगावातील शेतकरी पिकाची निर्यात करू शकतात. मग, विदर्भातील शेतकरी का करू शकत नाही. निर्यात करणाऱ्या शेती पिकांच्या दिशेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

टॅग्स :Petrolपेट्रोलNitin Gadkariनितीन गडकरी