शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राज्यसभेत तिरंगी झेंड्याचा बिल्ला लावण्यास अनुमती

By admin | Updated: June 4, 2016 02:35 IST

येत्या जुलैमध्ये प्रारंभ होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापासून राज्यसभेच्या सदस्यांना आपल्या परिधानांवर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी बिल्ला लावून सभागृहात प्रवेश करता येऊ शकेल.

नवी दिल्ली : येत्या जुलैमध्ये प्रारंभ होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापासून राज्यसभेच्या सदस्यांना आपल्या परिधानांवर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी बिल्ला लावून सभागृहात प्रवेश करता येऊ शकेल. राज्यसभा सदस्यांना तिरंगी बिल्ला लावण्यास अनुमती देणाऱ्या प्रस्तावाला सभापती हमीद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभेच्या सर्वसाधारण व्यवहार समिती (जनरल पर्पज कमेटी)ने एकमताने मान्यता दिली होती. त्यानंतर शुक्रवारी राज्यसभेने एक निवेदन जारी करून या निर्णयाची अंमलबजावणी पुढील पावसाळी अधिवेशनापासून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. राज्यसभेचे सदस्य विजय दर्डा यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर व आग्रही प्रस्तावानुसार हा विषय समितीपुढे आला होता. या प्रस्तावास मान्यता देताना १९८५ सालचा सभापतींचा निर्णय बदलण्यात आला आहे. राज्यसभेच्या सर्वसाधारण व्यवहार समितीने शिफारस केल्याप्रमाणे आता राज्यसभा सदस्यांना सभागृहात आपल्या परिधानांवर तिरंगी बिल्ला लावण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. समितीने आपल्या ३ मे रोजीच्या बैठकीत अशाप्रकारची शिफारस केली होती. सर्व सदस्यांना आपला कोट, शर्ट अथवा जाकिटावर तिरंगा बिल्ला लावण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी केली होती. त्यांच्या या सूचनेवर व्यापक विचार केल्यानंतर समितीने ही शिफारस केली होती. (वृत्तसंस्था)राज्यसभेच्या सभापतींनी १९८५ सालीच सभागृहात राष्ट्रध्वजासह अशी कोणतीही प्रतीके शर्ट, कोट वा जॅकेटवर मिरवण्यास मनाई करणारा आदेश दिला होता. त्याआधी लोकसभेच्या नियम समितीने राष्ट्रध्वजाचा सन्मान म्हणून खासदारांना असा तिरंगा बिल्ला लावून सभागृहात येण्याची अनुमती दिली होती. त्यासाठी तत्कालीन अध्यक्ष मीराकुमार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीला नियम ३४९ मध्ये दुरुस्ती करावी लागली होती. या नियम दुरुस्तीचेच उदाहरण देत खा. विजय दर्डा यांनी यांनी राज्यसभेतही तिरंगा बिल्ला लावून प्रवेश करण्याची परवानगी मिळावी, असा आग्रह धरला होता. १३ मे २०१६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाच्या समारोप भाषणातही दर्डा यांनी याचा पुन्हा उल्लेख केला व यापुढे तरी हा जुना निर्णय बदलावा, अशी कळकळीची विनंती सभापती अन्सारींना केली होती.