शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीला पूर्णविराम

By admin | Updated: June 3, 2016 02:56 IST

पश्चिम बंगालमधल्या पराभवानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोच्या बैठकीत उघडपणे दोन तट पडणार, हे दिसतच होते.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधल्या पराभवानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोच्या बैठकीत उघडपणे दोन तट पडणार, हे दिसतच होते. पश्चिम बंगालमधील पराभव आणि केरळमधील विजय यामुळे ते अधिकच रुंद झाले. केरळमधील पक्षाच्या नेत्यांनी बंगालमध्ये काँग्रेसशी आघाडी केल्याबद्दल महासचिव सीताराम येचुरी यांना धारेवरच धरले. त्यामुळे भविष्यात काँग्रेसशी कोणतीही तडजोड अथवा निवडणूकपूर्व आघाडी नको, या भूमिकेवर पॉलिटब्युरोने शिक्कामोर्तब केले. केरळस्थित करातसमर्थक सदस्यांनी पॉलिटब्युरोच्या बैठकीत महासचिव सीताराम येचुरींवर कठोर टीका करीत नाराजीचा सूर नोंदवला. केरळमधे डाव्या आघाडीचा विजय आणि पश्चिम बंगालच्या पराभवानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोची दिल्लीत बैठक झाली. काँग्रेसशी निवडणूकपूर्व आघाडी करू नये, असे स्पष्ट मत फेब्रुवारीत निश्चित केल्यानंतरही प. बंगालच्या निवडणुकीला काँग्रेसबरोबर सामोरे जाण्याचा निर्णय का घेतला? केंद्रीय समितीच्या निर्णयाचे उल्लंघन का झाले, असा सवाल करत पॉलिटब्युरोच्या काही सदस्यांनी सीताराम येचुरींवरच हल्ला चढवला. एक सदस्य म्हणाले, मार्क्सवादी कम्युनिस्टांनी देशात काँग्रेस अथवा भाजपाशी यापूर्वी कधीही आघाडी करून निवडणूक लढवली नाही, कारण हे दोन्ही पक्ष मूलत: सत्ताधारी प्रवृत्तीचे आहेत. जनआंदोलने वा लोकांच्या दैनंदिन समस्यांकडे पाहण्याचा डाव्या पक्षांच्या तुलनेत या दोन्ही पक्षांचा दृष्टिकोन भिन्न आहे. पर्यायच शोधायचा झाला तर समविचारी पक्षांशी सहकार्य करीत निवडणूक लढवणे, हीच माकपची नेहमीची भूमिका आहे. (विशेष प्रतिनिधी)...तर अनेक संकटे उभी राहिली असती - येचुरी१पॉलिटब्युरोच्या बैठकीत संतप्त सदस्यांना शांत करताना येचुरी म्हणाले की, पक्षाच्या प. बंगाल समितीने काँग्रेसशी आघाडी करून राज्यात निवडणूक लढवण्याची भूमिका बरीच आधी ठरवली होती. स्थानिक काडरने त्या दिशेने पूर्वीपासून तयारी चालवली होती. केंद्रीय समितीच्या निर्देशानुसार, राज्य समितीला ऐनवेळी तो निर्णय बदलण्यास भाग पाडले असते, तर अनेक संकटे उभी राहिली असती. अखेर गप्प राहून समितीच्या निर्णयाला दुजोरा देणेच उचित ठरणार होते.२येचुरींचा खुलासा पॉलिटब्युरोतल्या केरळच्या सदस्यांच्या काही फारसा गळी उतरला नाही. बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या पत्रकात पक्षाने म्हटले की प. बंगालमधे निवडणुकीची रणनीती केंद्रीय समितीच्या भूमिकेशी सुसंगत नव्हती.