शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केजरीवालांच्या आक्षेपानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 06:24 IST

मतदान उलटल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झालेल्या एकूण मतदानाची नेमकी आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर न केल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली होती.

नवी दिल्ली : ईव्हीएममधून मिळणारी झालेल्या मतदानाची आकडेवारी संगतवार लावण्यात वेळ लागल्याने मतदानाची नेमकी आकडेवारी जाहीर करण्यात उशीर झाल्याचा दावा दिल्ली निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंग यांनी केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान शनिवारी पार पडले. परंतु मतदान उलटल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झालेल्या एकूण मतदानाची नेमकी आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर न केल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली होती. केजरीवाल यांनी आयोगाच्या एकूण कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले होते. आम आदमी पक्षाचे नेतेही आयोगावर टीका करीत होते. सोशल मीडियातूनही आपच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केल्याने निवडणूक आयोगाने रविवारी रात्री घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन मतदानाची नेमकी टक्केवारी जाहीर केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत यावेळी एकूण ६२.५९ टक्केमतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सर्वाधिक ७१.६ टक्के मतदान बल्लीमारन या मतदारसंघात तर सर्वात कमी ४५.४ टक्के मतदान दिल्ली कॅन्टॉन्मेंट मतदारसंघात झाल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये एकूण ६०.५ टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत दोन टक्के अधिक मतदान झाले तर, गेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत ६७ टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत या खेपेला पाच टक्के कमी मतदान झाल्याचे आयोगाने स्पष्ट केले.दिल्लीत भाजपचेच सरकार; एक्झिट पोल चुकीचेमतदानानंतरच्या चाचण्यांनी दिल्लीत आम आदमी पक्षाला सत्ता मिळणार असल्याचे सांगितले असले तरी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चाचण्यांचे हे निकाल चुकीचे असल्याचे सांगत दिल्लीत भाजपच सरकार स्थापन करणार असा दावा केला आहे. जावडेकर म्हणाले की, भाजपला खºया निकालाची प्रतीक्षा आहे. मतदानोत्तर चाचण्या आणि अंतिम निकाल यांच्यात मोठा फरक असेल. लोकसभा निवडणुकीत मतदानोत्तर चाचण्यांचे केलेले भाकीत खोटे ठरले होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग