शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

लोक डोळ्यांदेखत वाहून जात होते, पण उपाय नव्हता; वायनाडमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 07:18 IST

भूस्खलन झाल्याचे समजल्याबरोबर जिबलू रहमान घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वाचविलेल्या एका व्यक्तीचे हात व पाय तुटलेले दिसले. जखमी लोक मदतीसाठी आक्रोश करत होते. 

वायनाड : केरळमधील भूस्खलनाची दुर्घटना होऊन आठवडा लोटला, तरी शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेच्या आठवणी अद्याप बचावकार्यात सहभागी कर्मचारी व अधिकाऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. लोक डोळ्यासमोर पूर व गाळात वाहून जात होते. मात्र, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी काहीही करू शकलो नाही, अशा वेदना बचाव अभियानादरम्यान आलेल्या संकटाची आपबिती सांगताना वायनाडच्या मेप्पाडी पोलिस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केली.

नेमके काय घडले?- भूस्खलन झाल्याचे समजल्याबरोबर जिबलू रहमान घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वाचविलेल्या एका व्यक्तीचे हात व पाय तुटलेले दिसले. जखमी लोक मदतीसाठी आक्रोश करत होते. - अत्यंत वेगाने पाणी खाली येत होते. या पाण्यासोबत चिखल, दगड व झाडे आणि सोबत लोक वाहून जात असल्याचे पाहून अंगावर काटा आला. ते गाळासोबत वाहून जात असताना मी काहीही करू शकलो नाही, अशा भावना रहमान यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :Keralaकेरळfloodपूर