शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

जनतेला योगीमुक्त उत्तर प्रदेश हवाय; अर्थसंकल्पावरून अखिलेश यादव यांची टीका

By देवेश फडके | Updated: February 22, 2021 16:36 IST

उत्तर प्रदेशचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मोफत पाणी, कामगारांना तासानुसार पैसे, अयोध्या विकासासाठी १४० कोटींची योजना, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम विमानतळ, उद्योग तसेच महिला, तरुण आणि आयटी क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली असून, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे हे अखेरचे बजेट ठरेल, असा दावा यावेळी यादव यांनी केला आहे.

ठळक मुद्देअखिलेश यादव यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकाजनतेला पेपरलेस बजेट नाही, योगीमुक्त उत्तर प्रदेश हवाय - अखिलेश यादवभाजप सरकार केवळ भांडवलदारांसाठी काम करतेय - अखिलेश यादव

प्रयागराज :उत्तर प्रदेशचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मोफत पाणी, कामगारांना तासानुसार पैसे, अयोध्या विकासासाठी १४० कोटींची योजना, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम विमानतळ, उद्योग तसेच महिला, तरुण आणि आयटी क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली असून, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे हे अखेरचे बजेट ठरेल, असा दावा यावेळी यादव यांनी केला आहे. (akhilesh yadav criticized on yogi government over budget)

योगी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. महागाई सातत्याने वाढत आहे. समाजवादी पक्षाने समाजातील प्रत्येक वर्गाला जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप सरकार केवळ भांडवलदारांसाठी काम करत आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. 

धोरण योग्य असेल, हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलतं: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पेपरलेस नाही, योगीमुक्त उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमधील जनतेला पेपरलेस अर्थसंकल्प नकोय, तर योगीमुक्त राज्य हवे आहे, असा दावा अखिलेश यादव यांनी केला. समाजवादी पक्षाने केलेली जुनी कामे लोकांसमोर नव्याने मांडली. अर्थसंकल्प पूर्णपणे सादर केला नाही. जनतेपासून सत्य लपवले जात आहे, असा आरोपही अखिलेश यादव यांनी यावेळी बोलताना केला. 

दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेश सरकारचा अर्थसंकल्प ३७ हजार ४१० कोटी रुपयांनी वाढला असल्याचे सांगितले जात आहे. पेपरलेस बजेटसाठी सर्व सदस्यांना टॅबलेट पुरवण्यात आले होते. योगी सरकारचे हे पाचवे बजेट असून, यामध्ये २७ हजार ५९८ कोटी रुपयांची तरतूद नव्या योजनांसाठी करण्यात आली आहे, असे समजते. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव