शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

जनतेने नव्या वर्षात स्वदेशी वस्तू वापरण्याचा करावा संकल्प- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 06:59 IST

‘मन की बात’ कार्यक्रमात केले आवाहन

नवी दिल्ली : देशातील जनतेने नव्या वर्षात विदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये रविवारी केले.

यंदाच्या वर्षातील मन की बातचा हा अखेरचा कार्यक्रम होता. पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर भारताच्या कार्यक्रमांतर्गत व्होकल फॉर लोकल ही मोहीम सरकार राबवत आहे. देशात जागतिक दर्जाची उत्पादने तयार होण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा. यंदा आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. प्रत्येक घराघरात स्वदेशी वस्तूंच्या वापरांविषयीचा संदेश पोहोचला आहे. मोहिमेबद्दल लोकांनी आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.  

नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, लोकांनी दररोज वापरात येणाऱ्या वस्तूंची एक यादी तयार करावी. त्यात जर विदेशी बनावटीच्या वस्तू असतील तर त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर सुरू करावा. स्वदेशी वस्तूंविषयी लोकांच्या मानसिकतेत अवघ्या एका वर्षाच्या आत मोठा सकारात्मक बदल झाला आहे. लोकांनी प्लॅस्टिकचा वापरही कमी करावा असेही ते म्हणाले.

केशराला ख्याती मिळवून देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काश्मीरचे केशर हे जागतिक ख्यातीचे व मोठ्या खपाचे उत्पादन बनावे यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला नक्की यश येईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात