शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

देशवासियांनी स्वत:ची ताकद ओळखावी - नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 3, 2014 12:04 IST

आकाशवाणीद्वारे देशातील करोडो नागरिकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आपली ताकद ओळखण्याचे आवाहन केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली दि. ३ - आकाशवाणीद्वारे देशातील करोडो नागरिकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आपली ताकद ओळखण्याचे आवाहन केले. 'मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे त्यांनी जनतेशी अनेक विषयांवर संवाद साधला. सिंह व लांडग्याची गोष्ट सांगत प्रत्येकाने आपला आत्मसन्मान व आत्मबळ ओळखावे असा सल्ला त्यांनी दिला. 
देशातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी त्यांना दस-याच्या मुहुर्तावर स्वच्छतेचा संकल्प करण्याचे तसेच आपल्यामधील दहा अवगुणांचा नायनाट करण्याची शपथ घ्यावी अशी इच्छाही व्यक्त केली. यावेळी त्यांनी नागरिकांना स्वदेशी वापरण्याचा सल्ला दिला. जास्तीत जास्त खादीची वस्त्रे वापरल्यास देशातील गरीबांना त्याचा फायदा होईल आणि देशाचा विकास होईल असे ते म्हणाले. जनतेने आपल्याला पाठवलेल्या ई-मेल मधील काही निवडक मेलचा उल्लेख करत त्यातील सल्ले लक्ष वेधून घेणारे असल्याचे सांगत त्यावर नक्की काम करण्यात येईल असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला.
देशातील शेतकरी, स्त्रिया आणि युवकांमध्ये खरी शक्ती आहे आणि सर्व समस्यांवर मात करण्याची ताकद या त्रिशुळामध्ये आहे असल्याचेही त्यांनी सांगितले. रेडियोच्या माध्यमातून देशाच्या कानाकोप-यातील सर्व नागरिकांशी, गरीबांशीही जोडले जाता येऊ शकते असे सांगत दर रविवारी सकाळी अकरा वाजता रेडिओवरुन आपण देशवासीयांशी संवाद साधणार आहोत असे त्यांनी जाहीर केले.