शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

अखेर लोकांना मिळाले इंटरनेट, बससेवाही पुन्हा झाली सुरू; नूह जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 08:44 IST

दोन आठवड्यांपूर्वी जातीय हिंसाचार उसळल्याने मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

गुरुग्राम : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने हरयाणाच्या नूह जिल्ह्यात सोमवारी (दि. १४) मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. 

दोन आठवड्यांपूर्वी जातीय हिंसाचार उसळल्याने मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीवर जमावाने हल्ला केल्यानंतर नूहसह आसपासच्या भागात हिंसाचार उसळून गृहरक्षक दलाचे दोन जवान व एका मौलवीसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सरकारने ८ ऑगस्टपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यानंतर इंटरनेटवरील बंदी १३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. हिंसाचारग्रस्त भागात बाजारपेठा उघडल्या असून, लोक नेहमीप्रमाणे तेथे  खरेदीला जात आहेत. शाळाही सुरू झाल्या आहेत.

पलवल जिल्ह्यातील पोंद्री गावात हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या ‘महापंचायती’ने जातीय हिंसाचाराने विस्कळीत झालेली ब्रज मंडळ यात्रा २८ ऑगस्ट रोजी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ३१ जुलै रोजी नूह येथील विहिंपच्या यात्रेवर झालेल्या हल्ल्याची एनआयए चौकशी करण्यासह अनेक मागण्याही महापंचायतीने केल्या.

स्वातंत्र्य दिन सोहळ्याची तयारी सुरू 

नूह येथे स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याची तयारी सुरू आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी पोलिस संचलन पथकेही तयारीला लागले आहेत. हरयाणा राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता परिस्थिती अगदी सामान्य आहे, असे उपायुक्त धीरेंद्र खडगटा यांनी सांगितले.

 

टॅग्स :Haryanaहरयाणा