शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

लोकांना चौकीदार नको रोजगार हवा, अखिलेश यांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 05:05 IST

जनतेला चौकीदार नको तर रोजगार हवा आहे, असा टोला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लगावला. स्वत:ची सकारात्मक कामे जनतेला सांगण्याऐवजी भाजपाचे नेते प्रचारसभांमध्ये फक्त विरोधी पक्षांवरच टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.

लखनऊ : जनतेला चौकीदार नको तर रोजगार हवा आहे, असा टोला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लगावला. स्वत:ची सकारात्मक कामे जनतेला सांगण्याऐवजी भाजपाचे नेते प्रचारसभांमध्ये फक्त विरोधी पक्षांवरच टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, लोकांनी स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या नोकऱ्या, रोजगार हवा आहे. त्यांना चौकीदार नको आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षणमित्र या योजनेखाली कंत्राटी शिक्षकांची भरती केली. त्या योजनेवरही अखिलेश यादव यांनी टीका करताना म्हटले आहे की, या देशातील बेकारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू. केंद्रामधील मोदी सरकारने बहुधा कोणतीही चांगली कामे केलेली नसावीत. त्यामुळेच आपल्या कामगिरीबद्दल न बोलता विरोधकांवर तोंडसुख घेण्यात भाजपा समाधान मानत आहे. आपला पराभव होईल अशी भीती वाटत असल्याने भाजपाचे नेते फारसा प्रचार करताना दिसत नाहीत. मात्र हे सत्य लपविण्यासाठी भयंकर उष्म्यामुळे आम्ही फार बाहेर पडत नाही अशी कारणे भाजपा नेते देताना दिसतात.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक