शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

महाराष्ट्रातील लोक भूमिका घेत नाहीत म्हणून पानसरे व दाभोलकरांसारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या- गुलजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 18:21 IST

गेल्या काही वर्षांत मुंबईतील बुद्धिवंतांच्या मानसिकतेत फरक पडला आहे.

मुंबई: पश्चिम बंगालमधील उच्चभ्रू बुद्धिवंतांप्रमाणे महाराष्ट्रातील लोक ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रात परखड विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींची हत्या झाली, असे मत ज्येष्ठ गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी व्यक्त केले. 'द वॉल' ला दिलेल्या मुलाखतीत गुलजार यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येसंदर्भात भाष्य केले. गुलजार यांनी पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतील विचारवंतांच्या मानसिकतेवर बोट ठेवले. पश्चिम बंगालमध्ये एखादी घटना घडल्यानंतर तेथील विचारवंत त्यावर व्यक्त होतात. त्याला प्रादेशिक प्रसारमाध्यमेही प्रसिद्धी देतात. त्यामुळे राज्यातील जनतेला या विचारवंताविषयी माहिती असते. मात्र, महाराष्ट्रातील लोक एखाद्या घटनेनंतर फारसे व्यक्त होताना दिसत नाहीत. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असताना कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्यासारखे विचारवंत परखडपणे बोलतात. प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. हे सहन न झाल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे गुलजार यांनी सांगितले. 

याशिवाय गुलजार यांनी म्हटले की, गेल्या काही वर्षांत मुंबईतील बुद्धिवंतांच्या मानसिकतेत फरक पडला आहे. सध्या मुंबईतील विशिष्ट वर्ग इंग्रजी वर्तमानपत्रे किंवा नियतकालिके वाचतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे येथील वर्तमानपत्रांमध्ये मुख्यत: व्यापाराशी आणि जाहिरातींशी निगडीत मजकूर असतो. त्यामुळे इतर बातम्यांना वर्तमानपत्रांमध्ये क्वचितच स्थान मिळते. याउलट मराठी आणि हिंदीतील प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये जनआंदोलनाच्या बातम्या छापून येत असतात. मात्र, बहुतांश लोक ही वर्तमानपत्रे वाचतच नसल्यामुळे त्यांना या घटनांबद्दल माहितीच नसते, असे गुलजार यांनी म्हटले. 

टॅग्स :gulzarगुलजारGovind Pansareगोविंद पानसरेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर