शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात शांतता

By admin | Updated: July 20, 2016 05:23 IST

काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता काश्मीर खोऱ्याने मंगळवारी ११ दिवसांनंतर प्रथमच शांतता अनुभवली.

श्रीनगर : काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता काश्मीर खोऱ्याने मंगळवारी ११ दिवसांनंतर प्रथमच शांतता अनुभवली. दुसरीकडे काजीगुंड घटनेबाबत लष्कराने तीव्र खेद व्यक्त करून चौकशीचे आदेश दिले आहेत. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी चकमकीत ठार झाल्यापासून खोऱ्यात हिंसाचार सुरू असून यात आतापर्यंत ४२ लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, राज्यात संचारबंदी सुरूच आहे. काजीगुंड येथे निदर्शकांनी सोमवारी लष्करी वाहनावर दगडफेक केली. तेव्हा सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन ठार तर निलोफर नावाच्या महिलेसह सहा जण जखमी झाले होते. उपचार सुरू असताना आज निलोफर यांचा मृत्यू झाला. लष्कराचे गस्ती पथक देवसरकडे जात होते. तेव्हा चुराहट काजीगुंड येथे लोकांनी रस्त्यावर अडथळे उभे केल्याचे पथकाला आढळून आले. जवान अडथळे हटवीत असताना काही समाजकंटकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू केली. वृत्तपत्र प्रकाशकांनी आज सलग पाचव्या दिवशी वृत्तपत्रे प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला. पीडीपी-भाजप सरकारने प्रसिद्धी माध्यमांवर निर्बंध लादले. तथापि, त्याची जबाबदारी स्वीकारण्यास ते तयार नाहीत तसेच हे दोन्ही पक्ष एकसुरात बोलत नसल्याच्या निषेधार्थ प्रकाशकांनी वृत्तपत्रे प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला. >अमरनाथ यात्रा पुन्हा सुरूकडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा येथील तळ छावणीहून मंगळवारी सायंकाळी पुन्हा सुरू झाली. परिस्थितीचा आढावा घेऊन यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी काश्मीर खोऱ्यातील दोन तळ छावण्यांहून २५९१ भाविकांचा जथा ६० वाहनांतून पवित्र गुंफेकडे रवाना झाला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.