शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

विकासासाठी शांतता, सलोखा आवश्यक, पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:37 IST

देशाच्या विकासासाठी शांतता, सलोखा आणि ऐक्य पूर्वावश्यक आहे, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना सामाजिक सद्भावासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली : देशाच्या विकासासाठी शांतता, सलोखा आणि ऐक्य पूर्वावश्यक आहे, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना सामाजिक सद्भावासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी अपरोक्षपणे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, स्वातंत्र्य आंदोलनात ‘वंदे मातरम’बद्दल आक्षेप घेण्यात आला होता, त्याचप्रमाणे ‘भारत माता की जय’ या जयघोषावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.काही लोकांना ‘भारत माता की जय’ बोलण्यास लाज वाटते, असे पंतप्रधान मोदी भाजप खासदारांच्या बैठकीत म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीतील दंगलीनंतर पक्षाच्या बैठकीत आपल्या पहिल्या भाषणात मोदी म्हणाले की, भाजपसाठी राष्टÑहित सर्वोच्च आहे, तर इतरांसाठी पक्षहित सर्वांत महत्त्वाचे आहे, असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.विकास हा आमचा मंत्र आहे आणि शांतता, सलोखा आणि एकता देशाच्या विकासाठी पूर्वावश्यक आहे. शांतता, सलोखा आणि एकतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास यावर भर देताना पंतप्रधान मोदी यांनी पक्ष नेत्यांना मन, वाचा आणि कृतीने देशाच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले. भारत माता की जय हा जयघोष मनात ठेवून त्यांनी देशाच्या विकासासाठी काम केले पाहिजे. कारण देशाचा विकास सर्वोच्च आहे, असेही ते म्हणल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या काही नेत्यांच्या द्वेषपूर्ण भाषणांमुळे दिल्लीत दंगल भडकली, असा आरोप विरोधी पक्ष करीत असताना पंतप्रधानांनी शांतता, सलोखा आणि एकतेचे आवाहन केले. बैठकीत मोदी यांनी जनऔषधी केंद्राच्या फायद्यांचाही ठकळपणे उल्लेख करीत या लाभार्थ्यांशी ७ मार्च रोजी संवाद करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंह