शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

ध्यानातूनच विश्वात शांती प्रस्थापित होऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:08 IST

आज जगाला शांती आणि सद्भावनेची आवश्यकता आहे. भगवान महावीर यांच्या ध्यानाच्या मार्गातूनच हे कार्य होऊ शकते.

इंदोर : आज जगाला शांती आणि सद्भावनेची आवश्यकता आहे. भगवान महावीर यांच्या ध्यानाच्या मार्गातूनच हे कार्य होऊ शकते. देशसेवेसोबतच वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समाजजागृती करणाºया आपल्यासारख्या व्यक्तींनाच हे कार्य करायचे आहे, या शब्दांत श्वेतांबर जैन समाजाचे आचार्य डॉ. शिवमुनीजी म.सा. यांनी सकल जैन समाजाचे अध्यक्ष, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांना उद्बोधन केले.आचार्यश्री इंदोर येथील खेलप्रशाल येथे चातुर्मास करीत आहेत. सोमवारी विजय दर्डा यांनी आचार्यश्रींची भेट घेतली. भगवान महावीर यांनी ध्यानालाच परमात्म्याला प्राप्त करण्याचे माध्यम म्हटले होते. प्रत्येक व्यक्तीला काही वेळेसाठी ध्यान करायला हवे. विशेषत: राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी तर ध्यान करायलाच हवे, असे आचार्यश्री म्हणाले. ज्याने स्वत:च्या आत्म्याला ओळखले तो परमात्म्याला प्राप्त करतो. तुम्हीदेखील ध्यानाकडे लक्ष केंद्रित करायला हवे, असे आचार्यश्री यांनी विजय दर्डा यांना म्हटले. ध्यान शिबिरात त्यांनी दर्डा यांना समाविष्ट करून घेतले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष म्हणून विजय दर्डा करीत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. नागपुरात प्रीतीसुधाजी म.सा. यांचा जो ऐतिहासिक चातुर्मास झाला, ते सकल जैन समाजासाठी अनुकरणीय उदाहरण आहे. या कार्यक्रमामुळे जैन समाजासोबतच विविध समूहांमध्ये विखुरलेल्या लोकांना एका सूत्रात बांधले. हे कार्य पुढेदेखील कायम ठेवा. आज समाजाला व देशाला मानवतेच्या एका सूत्रात बांधण्याची आवश्यकता आहे. आपल्यासारखे लोक पुढाकार घेतील, तेव्हाच हे शक्य आहे, असे उद्गार आचार्यश्री यांनी काढले.युवाचार्य डॉ. महेंद्रऋषी मुनी यांनी विजय दर्डा यांचा परिचय सांगितला. लोकमत समूहाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती त्यांनी आचार्यश्रींना दिली. आचार्यश्री यांनी १-२ सप्टेंबरला इंदोरमध्ये आयोजित ध्यान शिबिरात येण्यासाठी विजय दर्डा यांना आग्रहाचे निमंत्रण दिले.विजय दर्डा यांनी श्वेतांबर समाजाच्या साध्वी मणिप्रभा श्रीजी यांचेदेखील दर्शन घेतले. त्या इंदोरच्या महावीरनगर येथे चातुर्मास करीत आहेत. ओजस्वी आणि प्रखर वक्ता असलेल्या साध्वी मणिप्रभा श्रीजी यांनी अनेक विषयांवर दर्डा यांच्याशी सखोल चर्चा केली.या वेळी उद्योजक चैनसिंह मोदी, उमा मोदी, कमलेश मारू हेदेखील उपस्थित होते.