शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

ध्यानातूनच विश्वात शांती प्रस्थापित होऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:08 IST

आज जगाला शांती आणि सद्भावनेची आवश्यकता आहे. भगवान महावीर यांच्या ध्यानाच्या मार्गातूनच हे कार्य होऊ शकते.

इंदोर : आज जगाला शांती आणि सद्भावनेची आवश्यकता आहे. भगवान महावीर यांच्या ध्यानाच्या मार्गातूनच हे कार्य होऊ शकते. देशसेवेसोबतच वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समाजजागृती करणाºया आपल्यासारख्या व्यक्तींनाच हे कार्य करायचे आहे, या शब्दांत श्वेतांबर जैन समाजाचे आचार्य डॉ. शिवमुनीजी म.सा. यांनी सकल जैन समाजाचे अध्यक्ष, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांना उद्बोधन केले.आचार्यश्री इंदोर येथील खेलप्रशाल येथे चातुर्मास करीत आहेत. सोमवारी विजय दर्डा यांनी आचार्यश्रींची भेट घेतली. भगवान महावीर यांनी ध्यानालाच परमात्म्याला प्राप्त करण्याचे माध्यम म्हटले होते. प्रत्येक व्यक्तीला काही वेळेसाठी ध्यान करायला हवे. विशेषत: राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी तर ध्यान करायलाच हवे, असे आचार्यश्री म्हणाले. ज्याने स्वत:च्या आत्म्याला ओळखले तो परमात्म्याला प्राप्त करतो. तुम्हीदेखील ध्यानाकडे लक्ष केंद्रित करायला हवे, असे आचार्यश्री यांनी विजय दर्डा यांना म्हटले. ध्यान शिबिरात त्यांनी दर्डा यांना समाविष्ट करून घेतले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष म्हणून विजय दर्डा करीत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. नागपुरात प्रीतीसुधाजी म.सा. यांचा जो ऐतिहासिक चातुर्मास झाला, ते सकल जैन समाजासाठी अनुकरणीय उदाहरण आहे. या कार्यक्रमामुळे जैन समाजासोबतच विविध समूहांमध्ये विखुरलेल्या लोकांना एका सूत्रात बांधले. हे कार्य पुढेदेखील कायम ठेवा. आज समाजाला व देशाला मानवतेच्या एका सूत्रात बांधण्याची आवश्यकता आहे. आपल्यासारखे लोक पुढाकार घेतील, तेव्हाच हे शक्य आहे, असे उद्गार आचार्यश्री यांनी काढले.युवाचार्य डॉ. महेंद्रऋषी मुनी यांनी विजय दर्डा यांचा परिचय सांगितला. लोकमत समूहाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती त्यांनी आचार्यश्रींना दिली. आचार्यश्री यांनी १-२ सप्टेंबरला इंदोरमध्ये आयोजित ध्यान शिबिरात येण्यासाठी विजय दर्डा यांना आग्रहाचे निमंत्रण दिले.विजय दर्डा यांनी श्वेतांबर समाजाच्या साध्वी मणिप्रभा श्रीजी यांचेदेखील दर्शन घेतले. त्या इंदोरच्या महावीरनगर येथे चातुर्मास करीत आहेत. ओजस्वी आणि प्रखर वक्ता असलेल्या साध्वी मणिप्रभा श्रीजी यांनी अनेक विषयांवर दर्डा यांच्याशी सखोल चर्चा केली.या वेळी उद्योजक चैनसिंह मोदी, उमा मोदी, कमलेश मारू हेदेखील उपस्थित होते.