शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नाही, मेहबूबा मुफ्तींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 22:40 IST

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हे संघराज्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे, परंतु कलम 370 रद्द केल्याने राज्याचे विभाजन झाले आणि ते अकार्यक्षम झाले, असेही त्या म्हणाल्या. 

बंगळुरू: पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी मोठी घोषणा केली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरमध्येकलम 370 (Article 370) पुन्हा लागू होईपर्यंत विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. तसेच, आपला पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हे संघराज्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे, परंतु कलम 370 रद्द केल्याने राज्याचे विभाजन झाले आणि ते अकार्यक्षम झाले, असेही त्या म्हणाल्या. 

कर्नाटकातील नव्या काँग्रेस सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मेहबूबा मुफ्ती शनिवारी बंगळुरू येथे दाखल झाल्या होत्या. त्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी बंगळुरूमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, दिल्लीत जे काही घडले ते सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. भाजपला कोणताही विरोधक नको आहे. दिल्ली सरकार हतबल झाले आहे. हे प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे. जम्मू-काश्मीर आता खुले कारागृह बनले आहे. आमचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. 

मी ज्या कुटुंबातून मुख्यमंत्री होते, त्या कुटुंबात असे घडू शकते, तर ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. त्यामुळे कलम 370 पुन्हा बहाल होईपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, पण माझा पक्ष निवडणूक लढवेल. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हे संघराज्यवादाचे उत्तम उदाहरण आहे. पण कलम 370 रद्द करून सरकारने ते कमकुवत केले. चीन आता जम्मू-काश्मीरच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत आहे. यापूर्वी हे काम केवळ पाकिस्तान करत होता, असे मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले.  

याचबरोबर, आमच्या राज्यात सर्वात जास्त लष्कर तैनात आहे. तिथे सुरक्षेच्या नावाखाली दररोज छळ व अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात. जम्मूमध्ये G-20 शिखर परिषद होणार आहे. हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. पण भाजपने तो हायजॅक केला. त्यांनी लोगोचे रुपांतर कमळात केले. जी-20 चा लोगो एखाद्या पक्षाशी नव्हे तर देशाशी संबंधित असणे गरजेचे होते. सार्कच या प्रदेशात आपल्या देशाचे नेतृत्व प्रस्थापित करेल. आमचे प्रश्न सुटण्यासाठी सार्क परिषद येथेही झाली पाहिजे, असेही मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370