शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शाळेच्या थकीत फीपैकी ५०% तीन आठवड्यांत भरा; गैरफायदा घेणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 06:13 IST

थकित फीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

कोलकाता : शाळेच्या थकीत फीच्या ५० टक्के रक्कम पालकांनी तीन आठवड्यांच्या आत भरावी असा महत्वपूर्ण आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. जे पालक फी भरणार नाहीत, त्यांच्या मुलांना गुणपत्रिका देऊ नका असेही न्यायालयाने बजावले आहे.कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे अनेक पालकांना शाळेची पूर्ण फी भरणे शक्य झाले नव्हते. पण त्यामुळे शाळांचीही आर्थिक कोंडी झाली होती. जे विद्यार्थी दहावी, बारावीला होते, त्यांच्यापैकी ज्यांच्या पालकांनी शाळेची फी भरलेली नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका देऊ नका असा आदेशही न्यायालयाने शिक्षण मंडळांना दिला आहे. थकित फीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.न्यायालयाने म्हटले आहे की, २०२० सालापेक्षा आता आर्थिक स्थिती सुधारली आहे.  मात्र या स्थितीचा गैरफायदा घेऊन अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची संपूर्ण फी भरलेलीच नाही. अशा थकित फीची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे सरकारी कर्मचारी आहेत. त्यांना साथीमुळे पगाराविनाच राहावे लागले अशी स्थिती उद्भवली नाही.  शाळेच्या फीमध्ये सवलत द्यावी किंवा फी कमी करावी अशा मागणीसाठी न्यायालयात पालकांनी याचिका दाखल केली होती. फी भरणे मुद्दाम टाळलेकोलकाता उच्च न्यायालयाने सांगितले की, अनेक पालकांची शाळेची फी भरण्याची आर्थिक क्षमता आहे. पण त्यांनी मुद्दामहून हे पैसे भरणे टाळले आहे. शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या असून त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना पगार देण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत. शाळेच्या वास्तूच्या देखभालीचा खर्चही आहेच. विद्यार्थी व शाळा या दोघांच्या हिताचे संतुलन राखणे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी थकीत फी भरलीच पाहिजे.