शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भरडधान्यातून खाद्य सुरक्षेचा मार्ग - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 08:49 IST

‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली : खाद्य सुरक्षा आणि खानपानविषयक सवयींच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘भरडधान्ये’ उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. देशाच्या खाद्य टोपलीत या धान्यांची हिस्सेदारी वाढविण्यासाठी काम करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञांना केले.

‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारताचे प्रयत्न आणि प्रस्तावामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य’ वर्ष म्हणून घोषित केले आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. भरडधान्यास जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत  सातत्याने प्रयत्न करत आहे. भरड धान्ये ही प्रतिकूल हवामानात तसेच रसायने व खते यांच्या वापराविना सहजपणे उत्पादित केली जाऊ शकतात. 

भरडधान्याचे प्रमाण ५ टक्केभारताच्या राष्ट्रीय खाद्य टोपलीत भरडधान्यांची हिस्सेदारी आज केवळ ५ ते ६ टक्के आहे. ही हिस्सेदारी वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मी भारताचे शास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञांना करतो. त्यासाठी साध्य करण्याजोगी उद्दिष्ट्ये आपल्याला निर्धारित करावी लागतील, असे मोदी म्हणाले.

शेतकरी हाेत आहे सक्षमभरडधान्याद्वारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम हाेत आहे. देशात सुमारे २.५ काेटी शेतकरी प्रत्यक्षपणे भरडधान्याशी जुळलेले आहेत. त्यांना भरडधान्य मिशनचा लाभ होईल. यातून त्यांचे उत्पन्न वाढत असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत हाेईल, असे माेदी म्हणाले.

भरडधान्याचे सेवन वाढलेदेशात १२-१३ राज्यांमध्ये भरडधान्याचे उत्पादन हाेते. मात्र, त्यांचा वापर फार कमी हाेता. एक व्यक्ती महिनाभरात २ ते ३ किलाे भरडधान्य खायचा. आता हे प्रमाण दरमहा १४ किलाेवर गेले आहे.

टपाल तिकिटाचे अनावरण - राजधानी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या संकुलात ‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त काढण्यात आलेले ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३’ या विषयीचे टपाल तिकीट व नाण्यांचे अनावरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. - या परिषदेला १०० पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. १९ मार्च रोजी परिषदेचा समारोप होणार आहे. भारत यंदाच्या जी-२० देशांच्या परिषदेचा यजमान आहे. त्याचे औचित्य साधून भारत सरकारने भरडधान्यांचा विषय जी-२० परिषदेच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवरही घेतला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी