शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भरडधान्यातून खाद्य सुरक्षेचा मार्ग - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 08:49 IST

‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली : खाद्य सुरक्षा आणि खानपानविषयक सवयींच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘भरडधान्ये’ उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. देशाच्या खाद्य टोपलीत या धान्यांची हिस्सेदारी वाढविण्यासाठी काम करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञांना केले.

‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारताचे प्रयत्न आणि प्रस्तावामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य’ वर्ष म्हणून घोषित केले आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. भरडधान्यास जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत  सातत्याने प्रयत्न करत आहे. भरड धान्ये ही प्रतिकूल हवामानात तसेच रसायने व खते यांच्या वापराविना सहजपणे उत्पादित केली जाऊ शकतात. 

भरडधान्याचे प्रमाण ५ टक्केभारताच्या राष्ट्रीय खाद्य टोपलीत भरडधान्यांची हिस्सेदारी आज केवळ ५ ते ६ टक्के आहे. ही हिस्सेदारी वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मी भारताचे शास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञांना करतो. त्यासाठी साध्य करण्याजोगी उद्दिष्ट्ये आपल्याला निर्धारित करावी लागतील, असे मोदी म्हणाले.

शेतकरी हाेत आहे सक्षमभरडधान्याद्वारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम हाेत आहे. देशात सुमारे २.५ काेटी शेतकरी प्रत्यक्षपणे भरडधान्याशी जुळलेले आहेत. त्यांना भरडधान्य मिशनचा लाभ होईल. यातून त्यांचे उत्पन्न वाढत असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत हाेईल, असे माेदी म्हणाले.

भरडधान्याचे सेवन वाढलेदेशात १२-१३ राज्यांमध्ये भरडधान्याचे उत्पादन हाेते. मात्र, त्यांचा वापर फार कमी हाेता. एक व्यक्ती महिनाभरात २ ते ३ किलाे भरडधान्य खायचा. आता हे प्रमाण दरमहा १४ किलाेवर गेले आहे.

टपाल तिकिटाचे अनावरण - राजधानी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या संकुलात ‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त काढण्यात आलेले ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३’ या विषयीचे टपाल तिकीट व नाण्यांचे अनावरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. - या परिषदेला १०० पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. १९ मार्च रोजी परिषदेचा समारोप होणार आहे. भारत यंदाच्या जी-२० देशांच्या परिषदेचा यजमान आहे. त्याचे औचित्य साधून भारत सरकारने भरडधान्यांचा विषय जी-२० परिषदेच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवरही घेतला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी