शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भरडधान्यातून खाद्य सुरक्षेचा मार्ग - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 08:49 IST

‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली : खाद्य सुरक्षा आणि खानपानविषयक सवयींच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘भरडधान्ये’ उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. देशाच्या खाद्य टोपलीत या धान्यांची हिस्सेदारी वाढविण्यासाठी काम करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञांना केले.

‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारताचे प्रयत्न आणि प्रस्तावामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य’ वर्ष म्हणून घोषित केले आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. भरडधान्यास जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत  सातत्याने प्रयत्न करत आहे. भरड धान्ये ही प्रतिकूल हवामानात तसेच रसायने व खते यांच्या वापराविना सहजपणे उत्पादित केली जाऊ शकतात. 

भरडधान्याचे प्रमाण ५ टक्केभारताच्या राष्ट्रीय खाद्य टोपलीत भरडधान्यांची हिस्सेदारी आज केवळ ५ ते ६ टक्के आहे. ही हिस्सेदारी वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मी भारताचे शास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञांना करतो. त्यासाठी साध्य करण्याजोगी उद्दिष्ट्ये आपल्याला निर्धारित करावी लागतील, असे मोदी म्हणाले.

शेतकरी हाेत आहे सक्षमभरडधान्याद्वारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम हाेत आहे. देशात सुमारे २.५ काेटी शेतकरी प्रत्यक्षपणे भरडधान्याशी जुळलेले आहेत. त्यांना भरडधान्य मिशनचा लाभ होईल. यातून त्यांचे उत्पन्न वाढत असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत हाेईल, असे माेदी म्हणाले.

भरडधान्याचे सेवन वाढलेदेशात १२-१३ राज्यांमध्ये भरडधान्याचे उत्पादन हाेते. मात्र, त्यांचा वापर फार कमी हाेता. एक व्यक्ती महिनाभरात २ ते ३ किलाे भरडधान्य खायचा. आता हे प्रमाण दरमहा १४ किलाेवर गेले आहे.

टपाल तिकिटाचे अनावरण - राजधानी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या संकुलात ‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त काढण्यात आलेले ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३’ या विषयीचे टपाल तिकीट व नाण्यांचे अनावरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. - या परिषदेला १०० पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. १९ मार्च रोजी परिषदेचा समारोप होणार आहे. भारत यंदाच्या जी-२० देशांच्या परिषदेचा यजमान आहे. त्याचे औचित्य साधून भारत सरकारने भरडधान्यांचा विषय जी-२० परिषदेच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवरही घेतला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी