शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पठाणकोट हल्ला; अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर -सोनिया

By admin | Updated: January 5, 2016 00:36 IST

देशाच्या अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर बनल्याची चिंता काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतानाच

नवी दिल्ली : देशाच्या अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर बनल्याची चिंता काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतानाच त्यांनी जवानांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. सुरक्षा जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करीत त्यांनी या मोहिमेतील योगदानाचा उल्लेख केल्याचे काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. गुप्तचर संस्थांनी पूर्वसूचना देऊनही अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनल्यामुळे केंद्र सरकार पावले उचलेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. नागरिक आणि रणनीतीदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या संस्थांच्या सुरक्षेची बाब गंभीर बनल्याचे त्यांनी नमूद केले.1 पंजाब पोलीस अधीक्षकांचे अपहरण झाल्यानंतर अलर्ट जारी होण्याआधीच अतिरेक्यांनी पठाणकोटच्या हवाई तळाच्या परिसरात प्रवेश केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिरेक्यांनी लष्करी तंत्राचा पुरेपूर वापर करीत घुसखोरीचा डाव साधला, असे सुरक्षा संस्थांच्या सूत्रांनी म्हटले आहे. 2 पठाणकोट एअरबेससह महत्त्वाच्या सुरक्षासंस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानंतर जवानांनी अतिरेक्यांना हल्ला करता येऊ नये यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले. अतिरेकी १ जानेवारीच्या सकाळीच या परिसरात शिरले असावे, कारण काही तासांतच संध्याकाळी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. 3 पंजाबचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांनी सादर केलेल्या माहितीची शहानिशा करण्यात काही तास वाया गेले. अतिरेक्यांनी माझ्यासह अन्य दोघांचे अपहरण केले होते, अशी माहिती त्यांनी दिली होती. सलविंदरसिंग यांनी अतिरेक्यांबाबत माहिती देऊनही ही बाब गांभीर्याने घेण्यात न आल्यामुळे महत्त्वाचे काही तास वाया गेले. मोदी सरकारच्या पाकिस्तानसंबंधी विदेश धोरणात सातत्य नसल्यामुळे देशाच्या सीमा कधी नव्हे तेवढ्या असुरक्षित बनल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी भाषणांमधून पाकिस्तानसंबंधी धोरणात बदल होण्याचे संकेत दिले होते, मात्र त्यांचे धोरण निष्प्रभ ठरल्याचे दिसून येत आहे. - मायावती, बसपा अध्यक्षा