शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

बुटाच्या तळव्यात लपवून आणली ‘स्मोक स्टिक’! वाढीव सोल बसवून तयार केली जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 09:22 IST

मनोरंजन डी. आणि सागर शर्मा नावाच्या या तरुणांनी लोकसभेत आणलेल्या पत्रकांमध्ये तिरंग्याच्या पार्श्वभूमीत मुठीचे चित्र होते आणि मणिपूरमधील हिंसाचारावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक घोषणा होती.

नवी दिल्ली : लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी करून ‘स्मोक स्टिक’चा वापर करत धूर पसरवणाऱ्या दोन तरुणांनी आपल्या बुटाचा डावा तळवा कापून बनवलेल्या अतिरिक्त जागेत ती लपवून आणल्याचे दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.

मनोरंजन डी. आणि सागर शर्मा नावाच्या या तरुणांनी लोकसभेत आणलेल्या पत्रकांमध्ये तिरंग्याच्या पार्श्वभूमीत मुठीचे चित्र होते आणि मणिपूरमधील हिंसाचारावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक घोषणा होती.

आरोपींवर दाखल गुन्ह्यानुसार, संसद भवनाच्या आत आणि बाहेर उघडलेल्या ‘स्मोक स्टिक’वर उघडताना गॉगल आणि हातमोजे वापरावेत, अशी इशारेवजा सूचना लिहिलेल्या होत्या.

सागर शर्माने त्याच्या राखाडी एलसीआर बुटाचा डावा सोल कापून अतिरिक्त रबर जोडले होते आणि त्यात जागा करण्यात आली होती. मनोरंजनच्या डाव्या बुटाच्या सोलमध्येही अशीच जागा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उजव्या बुटाचा तळही अर्धवट कापलेला आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

भगतसिंग युवा फॅन क्लब’चे फेसबुक पेज डिलिट

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संसद सुरक्षा भंग प्रकरणात आणखी दोन व्यक्तींची चौकशी केली असून, त्यापैकी एकाला राजस्थानमधून गुरुवारी रात्री उशिरा उचलण्यात आले. दरम्यान, बुधवारपासून फरारी असलेल्या मास्टरमाईंड झा याने गुरुवारी रात्री नवी दिल्ली जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. या आरोपींच्या ‘भगतसिंग युवा फॅन क्लब’चे फेसबुक पेज डिलिट करण्यात आले आहे.

ललितचा भाऊ म्हणतो, कुटुंब धक्क्यात

मुख्य सूत्रधार ललित मोहन झा याचा मोठा भाऊ शंभू झा यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि सांगितले की, संपूर्ण कुटुंब अजूनही शॉकमध्ये आहे. तो या सगळ्यात कसा अडकला हे आम्हाला माहीत नाही. वादावादी, मारहाण यापासून तो नेहमीच दूर राहिला. लहानपणापासूनच तो शांत स्वभावाचा होता आणि कोणताही मिसळत नव्हता. तो खासगी शिक्षक असण्याव्यतिरिक्त, एका एनजीओशी संबंधित होता. त्याचे फोटो पाहून आम्हाला खरोखरच धक्का बसला.

चौघांचे मोबाइल नष्ट केल्याचा दावा

शिक्षक आणि एनजीओ सदस्य असलेल्या झा याने चौकशीत आरोपी सागर, मनोरंजन, नीलम आणि अमोल यांच्याकडून घेतलेले चार मोबाइल फोन नष्ट केल्याचा दावा केला आहे; परंतु, त्याची पडताळणी केली जात आहे.

हिंसक अराजकता चैतन्यशील लोकशाहीचे अपहरण करू शकत नाही. संवैधानिक अधिकारांची मजबुती आणि मूलभूत कर्तव्यांच्या मंत्राने भारताला अजेय लोकशाहीत रूपांतरित केले आहे. संवैधानिक सार्वभौमत्वाचे वर्चस्व यामुळे भारताला लोकशाहीची महाशक्ती बनविले आहे.

- मुख्तार अब्बास नक्वी,

माजी केंद्रीय मंत्री

टॅग्स :Parliamentसंसद