शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बुटाच्या तळव्यात लपवून आणली ‘स्मोक स्टिक’! वाढीव सोल बसवून तयार केली जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 09:22 IST

मनोरंजन डी. आणि सागर शर्मा नावाच्या या तरुणांनी लोकसभेत आणलेल्या पत्रकांमध्ये तिरंग्याच्या पार्श्वभूमीत मुठीचे चित्र होते आणि मणिपूरमधील हिंसाचारावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक घोषणा होती.

नवी दिल्ली : लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी करून ‘स्मोक स्टिक’चा वापर करत धूर पसरवणाऱ्या दोन तरुणांनी आपल्या बुटाचा डावा तळवा कापून बनवलेल्या अतिरिक्त जागेत ती लपवून आणल्याचे दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.

मनोरंजन डी. आणि सागर शर्मा नावाच्या या तरुणांनी लोकसभेत आणलेल्या पत्रकांमध्ये तिरंग्याच्या पार्श्वभूमीत मुठीचे चित्र होते आणि मणिपूरमधील हिंसाचारावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक घोषणा होती.

आरोपींवर दाखल गुन्ह्यानुसार, संसद भवनाच्या आत आणि बाहेर उघडलेल्या ‘स्मोक स्टिक’वर उघडताना गॉगल आणि हातमोजे वापरावेत, अशी इशारेवजा सूचना लिहिलेल्या होत्या.

सागर शर्माने त्याच्या राखाडी एलसीआर बुटाचा डावा सोल कापून अतिरिक्त रबर जोडले होते आणि त्यात जागा करण्यात आली होती. मनोरंजनच्या डाव्या बुटाच्या सोलमध्येही अशीच जागा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उजव्या बुटाचा तळही अर्धवट कापलेला आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

भगतसिंग युवा फॅन क्लब’चे फेसबुक पेज डिलिट

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संसद सुरक्षा भंग प्रकरणात आणखी दोन व्यक्तींची चौकशी केली असून, त्यापैकी एकाला राजस्थानमधून गुरुवारी रात्री उशिरा उचलण्यात आले. दरम्यान, बुधवारपासून फरारी असलेल्या मास्टरमाईंड झा याने गुरुवारी रात्री नवी दिल्ली जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. या आरोपींच्या ‘भगतसिंग युवा फॅन क्लब’चे फेसबुक पेज डिलिट करण्यात आले आहे.

ललितचा भाऊ म्हणतो, कुटुंब धक्क्यात

मुख्य सूत्रधार ललित मोहन झा याचा मोठा भाऊ शंभू झा यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि सांगितले की, संपूर्ण कुटुंब अजूनही शॉकमध्ये आहे. तो या सगळ्यात कसा अडकला हे आम्हाला माहीत नाही. वादावादी, मारहाण यापासून तो नेहमीच दूर राहिला. लहानपणापासूनच तो शांत स्वभावाचा होता आणि कोणताही मिसळत नव्हता. तो खासगी शिक्षक असण्याव्यतिरिक्त, एका एनजीओशी संबंधित होता. त्याचे फोटो पाहून आम्हाला खरोखरच धक्का बसला.

चौघांचे मोबाइल नष्ट केल्याचा दावा

शिक्षक आणि एनजीओ सदस्य असलेल्या झा याने चौकशीत आरोपी सागर, मनोरंजन, नीलम आणि अमोल यांच्याकडून घेतलेले चार मोबाइल फोन नष्ट केल्याचा दावा केला आहे; परंतु, त्याची पडताळणी केली जात आहे.

हिंसक अराजकता चैतन्यशील लोकशाहीचे अपहरण करू शकत नाही. संवैधानिक अधिकारांची मजबुती आणि मूलभूत कर्तव्यांच्या मंत्राने भारताला अजेय लोकशाहीत रूपांतरित केले आहे. संवैधानिक सार्वभौमत्वाचे वर्चस्व यामुळे भारताला लोकशाहीची महाशक्ती बनविले आहे.

- मुख्तार अब्बास नक्वी,

माजी केंद्रीय मंत्री

टॅग्स :Parliamentसंसद