शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"जर जनतेनं घोषणाबाजीसाठीच पाठवलं असेल, तर हेच करा अथवा..."; लोकसभाध्यक्ष भडकले, खासदारांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:30 IST

आज संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली. ते सरकारकडे महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा जारी करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, या गदारोळावरून लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी गदारोळ करणाऱ्या खासदारांना सुनावले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज (सोमवार) संसदेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. गेल्या काही दिवसांपूर्वी माहुकंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक दिसत आहेत. आज संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली. ते सरकारकडे महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा जारी करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, या गदारोळावरून लोकसभाध्यक्षओम बिर्ला यांनी गदारोळ करणाऱ्या खासदारांना सुनावले.

सभागृहात गोषणाबाजी - अर्थसंकल्पाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच, विरोधकांनी सरकारकडे महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात उत्तर देण्याची मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांवर भडकले आणि "जर जनतेने घोषणाबाजी करण्यासाठीच पाठवले असेल, तर हेच करावे अथवा कामकाच चालू द्यावे," अशा शब्दांत सुनावले.

काय म्हणाले ओम बिर्ला? -घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांना लोकसभा अध्यक्ष म्हणाले, "या मुद्द्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केला होता. आपण अभिभाषणावरील चर्चेदरम्यान हा विषय मांडू शकला असता. मात्र, प्रश्नोत्तराचा काळ हा महत्वाचा असतो. यात सरकारची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते." यावेळी बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले. 

मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी -लोकसभा अध्यक्ष म्हणाले, "जर देशातील जनतेने आपल्याला घोषणा देण्यासाठी पाठवले असेल, तर ते करा आणि जर तुम्हाला सभागृह चालवायचे असेल, तर आपापल्या जागेवर बसा." यावेळी महाकुंभ मेळ्यात जालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात विरोदी पक्षाच्या सदस्यांनी 'प्रधानमंत्री जवाब दो' आणि 'मोदी सरकार शेम शेम' अशी घोषणाबाजीही केली. तत्पूर्वी, मौनी अवमस्येला प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 30 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, यासंदर्भात सरकारने मृतांचा खरा आकडा सांगितला नाही, असा आरोप काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून केला जात आहे.

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाParliamentसंसद