शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

'देशाच्या अर्थव्यवस्थेला 'डबल A व्हेरिअंट'ची लागण, सगळीकडे अदानी-अंबानी'; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 19:43 IST

Rahul Gandhi In Parliament Budget Session 2022 Live: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारच्या अर्थनितीवर ताशेरे ओढले आहेत.

Rahul Gandhi In Parliament Budget Session 2022 Live: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारच्या अर्थनितीवर ताशेरे ओढले आहेत. राष्ट्रपतींचं अभिभाषण हे सत्यापासून खूप दूर होतं. गेल्या वर्षभरात ३ कोटीहून अधिक तरुणांना नोकरी गमावली. बेरोजगारीचा साधा उल्लेख देखील त्यांच्या भाषणात नव्हता, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच गेल्या ५० वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यावेळी भारतात असल्याचा दावा देखील राहुल गांधी यांनी केला आहे. 

यूपीएच्या सरकारनं देशात दरवर्षी २७ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्याचं काम केलं होतं आणि या सरकारनं २३ कोटी जनतेला पुन्हा गरीबीत ढकलण्याचं काम केलं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. "मोदी सरकारनं नोटबंदी आणि जीएसटीनं देशातील असंघटीत क्षेत्र नष्ट करण्याचं काम केलं आहे. यानंतर भारताचे दोन तुकडे झाले. एक श्रीमंताचा भारत आणि दुसरा गरिबांचा भारत", असा जोरदार हल्लाबोल राहुल गांधींनी लोकसभेत केला आहे. 

"देशातील फॉर्मल सेक्टरमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. दोन सर्वात मोठ्या उद्योगपतींबाबतही मी बोलणार आहे. कोरोनाच्या काळात वेगवेगळे व्हेरिअंट आले. हे दोन देखील वेगळे व्हेरिअंट आहेत की जे देशाच्या अर्थव्यवस्थेत पसरले आहेत. देशातील सर्व एअरपोर्ट्स, बंदरं, पावर, ट्रान्समिशन, खाणकाम, हरित उर्जा, गॅस, खाद्यतेल क्षेत्रात आता अदानी दिसत आहेत. तर अंबानींना टेलिकॉम, पेट्रोकेमिकल्स आणि ई-कॉमर्स क्षेत्रात एकाधिकारीशाही निर्माण करू दिली आहे. त्यामळे सारी संपत्ती या दोघांकडेच जात आहे. सर्व ठिकाणी अदानी आणि अंबानीच आहेत.", असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBudgetअर्थसंकल्प 2022