शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संसदेच्या बजेट सत्रात कामकाजाचा बोऱ्या, अविश्वास ठराव आलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 05:49 IST

संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. या २१ दिवसांत अवघे ४ तास ५२ मिनिटे (२९२ मिनिटे) कामकाज झाले. नीरव मोदीचे पलायन, एसएससी घोटाळा, फेसबुक डेटाचोरी, शेतकरी आत्महत्या, सीबीएसई पेपरफुटी यांवर चर्चा झालीच नाही.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली - संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. या २१ दिवसांत अवघे ४ तास ५२ मिनिटे (२९२ मिनिटे) कामकाज झाले. नीरव मोदीचे पलायन, एसएससी घोटाळा, फेसबुक डेटाचोरी, शेतकरी आत्महत्या, सीबीएसई पेपरफुटी यांवर चर्चा झालीच नाही. अपवाद एससी/एसटी अ‍ॅक्टचा. भारत बंदच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या निमित्ताने गृहमंत्री राजनाथसिंग यांनी ६ मिनिटांचे निवेदन केले. त्यावरील चर्चा दीड मिनिटांत आटोपली.लोकसभेत ४ एप्रिलपर्यंत सत्ताधारी व विरोधक यांची २0१९ वेळा आरडाओरड झाली, तर ५८ प्रसंगी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत सदस्यांनी घोषणाबाजी केली. कावेरी बोर्ड स्थापनेसाठी अद्रमुक सदस्यांचा गोंधळ सर्वाधिक होता. सत्ताधारी पक्षालाच कामकाज नको असल्याने अद्रमुक सदस्यांना गोंधळ घालायला लावल्याचा आरोपही विरोधकांनी केला. लोकसभा अध्यक्षांनी ६0 वेळेस सदस्यांना ‘आपापल्या जागेवर जा, गदारोळामुळे मला कोणाचेही म्हणणे ऐकू येत नाही, आता पुरे झाले’, असे आवाहन करूनही उपयोग झाला नाही. अध्यक्षांनी ४४ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित केले. त्या ४२ वेळा ‘आय एम सॉरी’ म्हणाल्या. लोकसभा अन् राज्यसभेचे कामकाज किमान १५ वेळा दोन ते तीन मिनिटांत संपले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून तेलगू देशमने गोंधळ घातला, तर अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी काँग्रेस, तृणमूलसह अन्य विरोधकही आक्रमक होते.सेनेचा विरोधदुसºया सत्राच्या २३ दिवसांत कोणतेही महत्त्वाचे कामकाज न झाल्याने एनडीएचे सदस्य २३ दिवसांचा पगार व भत्ते घेणार नसल्याची घोषणा संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी केली. मात्र हे आम्हास मान्य नाही, आमचा पगार दान करायचा अथवा तो कुठे कोणासाठी खर्च करायचा, याचा निर्णय शिवसेना घेईल, आमच्या वतीने हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही कोणाला दिलेला नाही, असे खा. संजय राऊ त म्हणाले.वित्त विधेयके व ४ अन्य विधेयके चर्चेशिवाय मंजूर झाली. सरकारवरील अविश्वासाचा प्रस्ताव दाखलच करून घेतला नाही. राज्यसभेत सुषमा स्वराज यांचे इराकमध्ये ३९ भारतीयांच्या हत्येबाबतचे निवेदन, निवृत्त सदस्यांना निरोप व नव्या सदस्यांचा शपथविधी हेच नीट झाले.लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास झाला नाही. प्रश्नांना लेखी उत्तरे मिळाली. पहिल्या सत्रात कामकाज २५ तास ५४ मिनिटांचे होते व झाले २८ तास २४ मिनिटे. दुसºया सत्रात १0३ तास २७ मिनिटे वेळ वाया गेली.

टॅग्स :ParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनnewsबातम्या