शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

संसदेचे कामकाज सुरू होताच ‘जय श्रीराम’च्या घोषणा; विरोधकांचा गोंधळ, कोणते मुद्दे गाजले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 12:18 IST

Parliament Budget Session 2024: संसदेत कामकाज सुरू होताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.

Parliament Budget Session 2024: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्याच्या संकल्पासह आमचे सरकार पुढे जात आहे. चार वर्षांमध्ये तेजीने आर्थिक विकास झाला आहे. जुलैमध्ये विकसित भारताचा रोडमॅप सादर करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले. यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. मात्र, संसदेच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.

संसदेच्या लोकसभा सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे विरोधकांकडून गोंधळाला सुरुवात झाली. दुसरीकडे, संसदेच्या राज्यसभा सभागृहात केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यात खडाजंगी झाली. पियुष गोयल यांनी काँग्रेस देश तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. याला मल्लिकार्जुन खरगे उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यावरून सभागृहात गदारोळ झाला. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. काँग्रेस कधीही देश तोडण्याचे बोलू शकत नाही. जर कोणी देश तोडण्याचे बोलले तर काँग्रेस त्याला विरोध करेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असे मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले.

हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईवरून काँग्रेस-भाजपा आमनेसामने

मल्लिकार्जुन खरगे यांनी झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्यावरील ईडी कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. बिहारमध्ये नितीश कुमार राजीनामा देतात आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करतात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात. परंतु झारखंडमध्ये अद्याप मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप खरगे यांनी लगावला. यावर, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे समर्थन करणे काँग्रेससाठी लज्जास्पद आहे. भ्रष्टाचार हा काँग्रेसच्याच डीएनएमध्ये आहे, असा पलटवार पियूष गोयल यांनी केला.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने सातत्याने नोटीस बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर होण्यास नकार देत आहेत. मला अटक करण्यासाठी हे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप केजरीवाल यांच्याकडून केला जात आहे. यावर केंद्रीय मंत्री अर्जून मेघवाल यांनी प्रतिक्रिया देताना, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. संविधानकर्त्यांनी कायद्याचे काम नेमून दिले आहे, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा