शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे कामकाज सुरू होताच ‘जय श्रीराम’च्या घोषणा; विरोधकांचा गोंधळ, कोणते मुद्दे गाजले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 12:18 IST

Parliament Budget Session 2024: संसदेत कामकाज सुरू होताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.

Parliament Budget Session 2024: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्याच्या संकल्पासह आमचे सरकार पुढे जात आहे. चार वर्षांमध्ये तेजीने आर्थिक विकास झाला आहे. जुलैमध्ये विकसित भारताचा रोडमॅप सादर करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले. यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. मात्र, संसदेच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.

संसदेच्या लोकसभा सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे विरोधकांकडून गोंधळाला सुरुवात झाली. दुसरीकडे, संसदेच्या राज्यसभा सभागृहात केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यात खडाजंगी झाली. पियुष गोयल यांनी काँग्रेस देश तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. याला मल्लिकार्जुन खरगे उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यावरून सभागृहात गदारोळ झाला. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. काँग्रेस कधीही देश तोडण्याचे बोलू शकत नाही. जर कोणी देश तोडण्याचे बोलले तर काँग्रेस त्याला विरोध करेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असे मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले.

हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईवरून काँग्रेस-भाजपा आमनेसामने

मल्लिकार्जुन खरगे यांनी झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्यावरील ईडी कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. बिहारमध्ये नितीश कुमार राजीनामा देतात आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करतात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात. परंतु झारखंडमध्ये अद्याप मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप खरगे यांनी लगावला. यावर, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे समर्थन करणे काँग्रेससाठी लज्जास्पद आहे. भ्रष्टाचार हा काँग्रेसच्याच डीएनएमध्ये आहे, असा पलटवार पियूष गोयल यांनी केला.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने सातत्याने नोटीस बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर होण्यास नकार देत आहेत. मला अटक करण्यासाठी हे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप केजरीवाल यांच्याकडून केला जात आहे. यावर केंद्रीय मंत्री अर्जून मेघवाल यांनी प्रतिक्रिया देताना, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. संविधानकर्त्यांनी कायद्याचे काम नेमून दिले आहे, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा